मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aai kuthe kay karte: अनिरुद्धच ठरणार खरा; संजनाने गौरीला दिलेल्या सल्ल्याने मालिकेत घडणार मोठी घडामोड

Aai kuthe kay karte: अनिरुद्धच ठरणार खरा; संजनाने गौरीला दिलेल्या सल्ल्याने मालिकेत घडणार मोठी घडामोड

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

'आई कुठे काय करते' मालिकेत काय घडणार आगामी भागात जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 ऑक्टोबर :  'आई कुठे काय करते' मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक होत चालली आहे.  गौरी आणि यश एकमेकांपासून कायमचे दूर होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांना ज्याची भीती होती तेच होणार आहे. आधी दाखवण्यात येणाऱ्या कथानकावरून गौरी यशला सोडून निघून जाणार का असा अंदाज प्रेक्षकांकडून लावण्यात येत होता. मात्र आता तो अंदाज खरा ठरतोय. गौरी आणि यश यांचं नातं आता तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. त्यात देशमुख कुटुंबीय आनंदात दिवाळी साजरी करत आहे. गौरीसुद्धा अमेरिकेहून परत आली आहे. ती तिकडे गेली होती तेव्हा तिने यशला दुर्लक्षच केलं होतं. आता आल्यावर तीने यशला तिचा मोठा निर्णय सांगितलं आहे.

गौरीला तिच्या कामासाठी परदेशात मोठी ऑफर आली आहे. त्यामुळे तिने परदेशी कामासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इथे यश तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. आता ही बातमी समजताच त्यालाही मोठा धक्का बसला आहे. त्याला गौरीविषयी जी शंका होती तेच घडणार आहे. दुसरीकडे अनिरुद्ध पुन्हा एकदा यशला गौरीविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अनिरुद्ध आणि संजना सुद्धा घटस्फोट घेणार आहेत. त्यालाच धरून अनिरुद्ध यशला गौरीविरुद्ध बोलत आहे. अनिरुद्ध यशला म्हणतो कि, ''गौरी संजनाचीच भाची आहे. ती तिच्यासारखीच वागणार'' यावर सगळे अनिरुद्ध वर चिडतात. पण आता अनिरुद्धचं खरा ठरणार असं दिसतंय.

हेही वाचा - Tejaswini pandit : लेट पण थेट! मोठ्या बहिणीचा ओरडा खाऊन तेजस्विनीने आता दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. सिरीयल जत्राने हा प्रोमो पोस्ट केला आहे. त्यानुसार संजनाच गौरीला यशला सोडून जाण्याचा सल्ला देणार आहे. संजना गौरीला म्हणते कि, ''तू त्याच्यामुळे तुझा निर्णय बदलू नकोस. तू जे ठरवलं आहेस तेच कर. त्याचं तुझ्यावर खरं प्रेम असेल तर तो येईल तुझ्या मागे.'' गौरी सुद्धा तिच्या मतावर कायम आहे. पण संजना हे सगळं बोलत असताना ईशा  त्यांचं बोलणं ऐकते. त्यामुळे आता त्यांच्यामध्ये पुन्हा मोठा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. आता या सगळ्यात यशची मात्र फरपट होत आहे. आता यश कोणता निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मालिकेत कायम आईच्या बाजूने उभा राहणारा यश आता अरुंधती आणि आशुतोषला एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्न करतोय. आशुतोष सोबत नवीन नातं जोडण्यासाठी तो अरुंधतीला पाठींबा देतोय. पण हे करत असताना आता त्याच्याच गौरीसोबतच्या नात्याची घडी विस्कटणार कि तो समजूतदारपणे हे सांभाळणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. गौरी यशला कायमची सोडून जाणार का आणि अरुंधती हे सगळं कसं  सांभाळणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये समजेल.

आई कुठे काय करते'  करते मालिकेचा टीआरपी घसरून मालिकेचा क्रमांक घसरला होता. पण मालिकेतील रंजक वळणांमुळे 'आई कुठे काय करते' ने बाजी मारली असून या आठ्वड्यात मालिकेने  टीआरपी  रेटिंगमध्ये पुन्हा पहिला क्रमांक पटकावला आहे.

First published:

Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment