नवी दिल्ली 17 नोव्हेंबर : दिल्लीतील मेहरौली येथे श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा आरोप आफताबवर होत असून या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत . श्रद्धा खून प्रकरणात हत्येच्या रात्री काय घडलं? ज्यावरून वाद इतका वाढला की, आरोपी आफताबने राक्षस बनून श्रद्धाची हत्या केली. याबाबत खुद्द आफताब पूनावालाची कबुली समोर आली आहे. एकमेकांना धोका देत असल्याच्या संशयावरून रोज दोघांचं भांडण व्हायचं. मात्र, ज्या दिवशी हत्या झाली, त्यादिवशी भांडणाचं खरं कारण होतं, की घराचा खर्च कोण उचलणार. मुंबईहून इकडे सामान कसे हलवणार? हत्येच्या रात्री श्रद्धा आणि आफताब यांच्यात घरखर्च आणि सामानाच्या शिफ्टिंगवरून भांडण झाल्याचं आफताबने उघड केलं आहे. Shraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करताना आफताब झाला होता जखमी, त्यानंतर… एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आफताब अमीन पूनावाला याने पोलिसांना सांगितलं की, हत्येपूर्वी मुंबईतून घरातील सामान हलवण्यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. एवढंच नाही तर, आफताब आणि श्रद्धा यांच्यात त्या रात्री घरगुती खर्चावरून भांडण झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. याआधीही एकमेकांची फसवणूक केल्याच्या संशयावरून त्यांच्यात अनेकदा भांडणं होत असत. आफताब अमीन पूनावाला याने आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने दक्षिण दिल्लीच्या छतरपूर परिसरात फेकल्याचा आरोप आहे.
पोलीस तपासात असं समोर आलं की,18 मे रोजी श्रद्धा आणि आफताबमध्ये भांडण झालं होतं, त्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, 18 मे रोजी या जोडप्यामध्ये झालेली भांडणं ही काही पहिली वेळ नव्हती. या दोघांमध्ये तीन वर्षांपासून भांडण सुरू होतं. एएनआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी सांगितलं की, ‘18 मे रोजी मुंबईहून घरगुती सामान आणण्यावरून दोघांमध्ये भांडण झालं. घराचा खर्च कोण उचलणार आणि सामान कोण आणणार यावरून भांडणं व्हायची. याचा आफताबला खूप राग आला. 18 मे रोजी रात्री आठच्या सुमारास दोघांमध्ये भांडण सुरू झालं. भांडण इतकं वाढलं की आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्याने तिचा मृतदेह रात्रभर खोलीत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तो चाकू आणि रेफ्रिजरेटर घेण्यासाठी गेला. Shraddha murder case Update : श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये अन् आफताब दुसऱ्याच मुलीसोबत राहत होता घरात दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी दाखल केलेल्या बेपत्ता तक्रारीची चौकशी सुरू केल्यानंतर गेल्या शनिवारी आफताबला अटक करण्यात आली. आफताबने तपासाच्या सुरुवातीच्या दिवसांत दिल्ली आणि मुंबई पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. हत्येचे पुरावे नष्ट करून आफताबने श्रद्धाचा खून लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही. आफताबने यापूर्वी पोलिसांना सांगितलं होतं की, श्रद्धा 22 मे रोजी फक्त तिचा फोन घेऊन घरातून निघून गेली होती. मात्र, पोलिसांनी तिच्या फोन आणि अकाऊंटचे डिटेल तपासले असता आफताबचं खोटं पकडलं गेलं आणि सत्य समोर आलं. देशातील 5 अंगावर शहारे आणणारे हत्याकांड हत्येच्या आठवडाभर आधी (१८ मे) आपण श्रद्धाची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याची कबुली आफताबने दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आफताब म्हणाला, ‘18 मेच्या एक आठवडा आधी मी श्रद्धाला मारण्याचा निर्णय घेतला होता. त्यादिवशीही श्रद्धा आणि माझे भांडण झाले. मी तिला मारण्याचा निर्णय घेतला होता आणि मी ते करणारच होतो, तेव्हा श्रद्धा अचानक भावुक झाली आणि रडू लागली. यानंतर मी माझा विचार बदलला आणि माघार घेतली.’ आफताबने सांगितलं की, श्रद्धाचा माझ्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे तिला अनेकदा राग यायचा, त्यामुळे अनेकदा भांडण व्हायचं.