मराठी बातम्या /बातम्या /करिअर /वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सोडली 22 लाखांची नोकरी, IPS नीरज जादौन यांची संघर्षमय कहणी

वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सोडली 22 लाखांची नोकरी, IPS नीरज जादौन यांची संघर्षमय कहणी

बंगळुरूतील एक कंपनीत 22 लाखांची नोकरी सोडून झाले IPS. नीरज यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी

बंगळुरूतील एक कंपनीत 22 लाखांची नोकरी सोडून झाले IPS. नीरज यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी

बंगळुरूतील एक कंपनीत 22 लाखांची नोकरी सोडून झाले IPS. नीरज यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी

    नवी दिल्ली, 03 जुलै : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या आणि वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी लाखोंची नोकरी सोडून पोलीस दलात भरती होणाऱ्या नीरज जादौन यांच्या संघर्ष कसा होता आणि त्यांनी यावर कशी मात केली त्यांची काहणी जाणून घेणार आहोत.

    नीरज हे उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील नौरेजपूर गावाचे रहिवासी.पोलीस दलात सुपरहिरो म्हणून त्यांची ओळख आहे. सुपरहिरोपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांची आई 8वी तर वडील केवळ 12 वी पर्यंत शिकलेले. 5 भावंडांमध्ये सर्वात मोठे नीरज. त्यांचं शालेय शिक्षण कानपूरमध्ये त्यानंतर त्यांना नोएडामध्ये नोकरीही मिळाली. तिथे त्यांनी वर्षभर काम केलं. मात्र एका प्रसंगानं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तो प्रसंग होता त्यांच्या वडिलांच्या हत्येचा.

    हे वाचा-अभिमन्यूनं भेदलं अशिक्षिततेचं चक्रव्यूह, शेतकऱ्याच्या मुलाची लय भारी कहाणी

    6 डिसेंबर 2008 रोजी शेतीच्या विवादातून नीरज यांच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी नीरज अवघ्या 26 वर्षांचे होते. वडिलांच्या हत्येनंतर कुटुंबाची जबाबदारी नीरज यांच्यावर आली.

    ही घटना घडली तेव्हा नीरज बंगळुरूतील एक कंपनीत 22 लाखांची नोकरी करत होते. 2013 पर्यंत त्यांनी कंपनीत काम केले यासोबतच वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाच्या खेट्याही घालत होते. वडिलांच्या हत्येप्रकरणी नीरज कोर्टात केस सुरू होती. हत्येप्रकरणी पोलिसांची वृत्ती त्यांच्या मनात व मनात रागाने भरली होती. त्यानंतरच त्याने आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. नीरज म्हणाला, “मी नोकरी करत असताना केस लढत होतो. एकीकडे माझी मोठी नोकरी होती, परंतु वडिलांना न्याय मिळावा म्हणून पोलिस प्रशासनासमोर भीक मागावी लागली. माझे कुटुंब कानपूर येथे राहत होते. त्यांना आरोपींकडून सतत धमकावले जात होते. सर्वजण भीतीच्या वातावरणात जगत होते. "

    हे वाचा-उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS

    पंकजच्या धाकट्या भावाला 2010 मध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर नीरज यांनी IPS पदासाठी अर्ज भरला. 2011 मध्ये पहिल्या मुलाखतीपर्यंत मजल मारली मात्र हाती अपयश आलं. मात्र वर्षभर पुन्हा एकदा जोमानं तयारी करून 2012च्या परीक्षेत 546 वा क्रमांक मिळवला. इंडियन पोस्ट आणि टेलिकम्युनिकेशन अकाउंट्स आणि फायनान्स सर्व्हिसेसमध्ये एक पद मिळाले. पण पोलीस दलात जाण्याचं स्वप्न मात्र अद्यापही अधूरंच होतं. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि 140 वा क्रमांक पटकावला त्यानंतर मुलाखतीमधून त्यांची निवड झाली.

    पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांच्या धाडसी निर्णय आणि बेधडक कामांमुळे त्यांच्यावर 6 वेळा हल्लाही झाला आहे. पोलीस दलातील सुपरहिरो म्हणून त्यांची ओळख आहे. नीरज आपल्या कर्तव्यदक्षतेसोबतच अनेक समाजसेवेची कामही करत आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हा संघर्षमय होता मात्र मनात जिद्द आणि इच्छा कायम जागृत होती. वडिलांवर झालेला अन्याय शांत बसू देत नव्हता आणि मनातही उर्मी पोलीस दलात भरतीसाठी सतत प्रोत्साहन देत होती.

    संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

    First published:

    Tags: Career, Career graph, IPS, IPS officer, Upsc, Upsc exam