New Delhi: Prime Minister Narendra Modi chairs a meeting with National Disaster Management Authority officials regarding the situation in Visakhapatnam, in New Delhi, Thursday, May 07, 2020. (PIB/PTI Photo)(PTI07-05-2020_000060B)
नवी दिल्ली 9 जून: केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालयात आणि विविध विभागांत कोरोना विषाणूची नोंद झाल्यानंतर केंद्र सरकारने आपल्या कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एका दिवसात 20 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे केंद्र सरकारमधील विविध मंत्रालयाला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचविणे शक्य होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हे आदेश दिले आहेत. कार्मिक लोक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने एक परिपत्रक काढले आहे, की केवळ त्याच कर्मचाऱ्यांनी कार्यालयात यावे ज्यांना कोरोना विषाणूशी संबंधित कोणतीही लक्षणे नाहीत. ज्या कर्मचाऱ्यांना हलका ताप, घसा खवखव इत्यादी लक्षणे आहेत त्या सर्वांनी घरीच रहावे कार्यालयात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचार्यांना सरकारने घरून काम करण्यास सांगितले आहे. एका दिवसात 20 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालयात हजर राहू नये असे सरकारचे म्हणणे आहे. त्यानुसार विभागात ड्युटी चार्ट बनविण्यास सांगण्यात आले आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार केबिनमध्ये काम करणारे कर्मचारी वेगवेगळ्या दिवशी कार्यालयात येतात. अखेर भारतासमोर झुकला चीन, LACवरून 2.5 किमी सैन्य बोलावलं माघारी! खिडक्या उघडा आणि शक्य असेल तिथे बसून रहा. ऑफिसमध्ये काम करताना मास्क किंवा फेस शिल्ड घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी तसे न केल्यास कर्मचार्यावर कारवाई केली जाईल, असे बजविण्यात आले आहे. कार्यालयात शक्य असेल तर तेवढी बैठक आणि चर्चा घेण्यास टाळण्यास सांगितले आहे . आमने- सामने भेट होणार नाहीत अशीही काळजी घ्या अशा मार्गदर्शक सूचनां सरकारने केल्या आहेत. या सर्वांसाठी इंटरकॉम आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घ्यावी असे सुचविण्यात आले आहे. दर अर्ध्या तासाने कर्मचार्यांना आपले हात धुवावे तसेच कार्यालयात हँड सॅनिटायझर्स सुद्धा बसवावेत, असा आदेश देण्यात आला आहे. भारताबाबत वैज्ञानिकाचा दावा ठरतोय खरा, जुलैमधील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालय, निर्माण भवन, नीती भवन ,परिवहन भवन, केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि संसदीय सचिवालयात अनेक कर्मचारी कोरोनचे बळी झाले आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. संपादन - अजय कौटिकवार