Mumbai: People at a market to buy essential items during day-2 of a nationwide lockdown, imposed in the wake of coronavirus pandemic, at Dongri Market, in Mumbai, Thursday, March 26, 2020. (PTI Photo)(PTI26-03-2020_000265B)
नवी दिल्ली, 10 एप्रिल : कोरोनामुळे जग हादरून गेलं आहे. अशातच भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकार आणि सर्व राज्यांमध्येही कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिमी चंपारणच्या जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र समोर आलं आहे. सीमेपलिकडून काही लोक भारतात आणि विशेषत: बिहारमध्ये कट रचून कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरवण्याच्या तयारीत असल्याचं यात म्हटलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच जे पत्र आहे त्यामध्ये एसएसबी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून सीमा सुरक्षा दलाला काही सूचना देण्यात आल्या आहेत. नवभारत टाइम्स ने हे पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, सीमेपलिकडून कोरोनाचा संसर्ग झालेले संशयित भारतात पाठवण्यात आले आहेत. या पत्रानुसार 40 ते 50 कोरोनाचे रुग्ण असल्याचं म्हटलं आहे. भारतात कोरोना पसरण्याचा यांचा उद्देश आहे.
पत्रानुसार भारतात दाखल होणारे हे शस्त्र तस्करी करणारे आहेत. त्यामध्ये जालिम मुखिया नावाच्या व्यक्तीचा उल्लेख असून तो नेपाळमधील पारसा जिल्ह्यातल्या जगन्नाथपूर इथला आहे. जालिम मुखियाच्या कटानुसार कोरोना संसर्ग झालेल्या संशयित रुग्णांना नेपाळच्या बॉर्डरवरील रस्त्यानं भारताकडे पाठवण्यात आलं आहे. यामुळे सीमा सुरक्षा बलानं त्यांचा पहारा कडक करावा आणि दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे वाचा : ‘कोरोना’पासून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेल्वेनं असं केलं प्लॅनिंग! जिल्हाधिकाऱ्यांचे हे पत्र समोर आल्यानंतर गृहसचिव अमीर सुबानी यांनी सांगितलं की, सर्व बाजूंनी याचा तपास केला जात आहे. गृहमंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. कोणालाही अशा प्रकारे देशात घुसू दिलं जाणार नाही. प्रकरण नेपाळमध्ये असलं तरी आम्ही आपल्या अधिकाऱ्यांना सावध केलं आङे. अद्याप असे लोक देशात घुसले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार त्यांची तयारी सुरू आहे. हे वाचा : ओडिशानंतर ‘या’ राज्याने 1 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत 60 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 15 जण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राने राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. हे वाचा : सोशल डिस्टन्सिंग शिकावं तर यांच्याकडून, पठ्ठ्यानं झाडावरच बांधलं घर; पाहा Photos संपादन - सुरज यादव