कार-ट्रकचा भीषण अपघात
रायगड, 20 फेब्रुवारी : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे कुटुंब कोल्हापूरला बाळूमामाच्या यात्रेसाठी निघाले होते. मात्र वाटेतच काळाने घाला घातला. पेण तालुक्यातील सावरसई परिसरात हा अपघात घडला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात कारने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुरडा झाला. तीन जण जागीच ठार अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, दिंडे कुटुंब कोल्हापूरला बाळूमामाच्या यात्रेसाठी निघाले होते. मात्र पेण तालुक्यातील सावरसई परिसरात ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची कार समोरून येणाऱ्या एका ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा : आणखी एक श्रद्धा! प्रेमप्रकरणातून तरुणीसोबत भयानक कांड; 25 दिवसानंतर पोलिसांनी विहिरीतून काढले मृतदेहाचे तुकडे मृतांची नावं विक्रम गोविंद दिंडे, नागेश विक्रम दिंडे व प्राजक्ता दिंडे अशी मृतांची नावं असून, या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत, हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे.