(शिर्डीच्या साईबाबा मंदिर)
हरीष दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी, 27 एप्रिल : शिर्डीच्या साई मंदिर सुरक्षेसाठी साईसंस्थान आणि महाराष्ट्र पोलिसांच्या, ऐवजी केंद्रीय सुरक्षा दल (CISF) सुरक्षा व्यवस्था देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रस्तावित केंद्रीय सुरक्षा दल सुरक्षा व्यवस्थेला शिर्डीकरांचा विरोध असून यासह चार मागण्या घेवून शिर्डीकरांनी आक्रमक पवित्रा घेत 1 मे पासून शिर्डी शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. शिर्डीच्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने साई मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. साईबाबा मंदिरातील सुरक्षा व्यवस्था साई संस्थान कर्मचारी करतात. तर मंदिर परिसराच्या सुरक्षेतेसाठी महाराष्ट्र पोलिसांची कुमक नेमण्यात आली आहे. याच बरोबरीने दररोज बॉम्ब शोधक पथकाडून मंदिराची तपासणी केली जाते. मात्र या सुरक्षा व्यवस्थेऐवजी CISF ची सुरक्षा साईबाबा मंदिराला असावी अशी चर्चा होत होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2018 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने साई संस्थानला निर्देश दिले आहेत.
CISF नेमणुकीबाबत उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला म्हणणे मागवले आहे. कदाचित साई संस्थान या सुरक्षा व्यवस्थेला मंजुरी देवू शकते असा अंदाज ग्रामस्थांना आल्याने ग्रामस्थांनी या विरोधात न्यायालयीन लढा लढण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निधी जमवण्यासाठी दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी भिक्षा झोळी आंदोलनही केले होतं. आता येत्या 1 मेपासून शिर्डीतील सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (जोडे पुसणारे गरीब असतील, पण… मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार) बुधवारी शिर्डीतील सर्व पक्षीय नेते आणि ग्रामस्थ यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत प्रामुख्याने साई मंदिराला CISF सुरक्षा नकोय, तसंच अन्य चार मागण्या घेवून शिर्डी ग्रामस्थ 1 मे महाराष्ट्र दिनापासून शिर्डी शहर बेमुदत बंद आंदोलन सुरू करणार आहे. तसंच 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिरा जवळ ग्रामसभा घेवून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे शिर्डी ग्रामस्थ यांनी सांगितलं आहे. (राष्ट्रवादीत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक आशावादी, जयंत पाटील मनातलं बोलले!) ग्रामस्थांच्या विरोधानंतर आता संस्थान काय भूमिका घेणार? आणि न्यायालय काय आदेश देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र दुसरीकडे जर केंद्रीय सुरक्षा बलामुळे साई मंदिर आणि भक्तांना चांगली सुरक्षा मिळणार आहे तर ग्रामस्थांचा त्यास विरोध का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डीत काय सुरू? साईबाबा मंदिर भाविकांनासाठी खुल राहणार आहे साईबाबा संस्थानचे सर्व भक्त निवास सुरू राहणार साईबाबा प्रसादालय,भोजनालय सुरू राहणार साईबाबा संस्थानच्या सर्व सुविधा भाविकांसाठी सुरू राहणार आहे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी गेस्ट हाऊस, लॉजिंग सुरू ठेवणार काय बंद? इतर सर्व व्यवसाय पूर्ण पणे बंद ठेवण्यात येणार काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या - साईबाबा मंदिराला CISF सुरक्षा व्यवस्था नको, आहेतीच सुरक्षा योग्य - साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद IAS अधिकारीकडे नको हे पद रद्द करून शासनाचा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकारीकडे असावे - साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेल्या समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असून सर्व निर्णय प्रलंबित आहे. तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी. - शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमणुक करण्यात यावे. यात शिर्डीतील 50℅ विश्वस्त नेमणूक करावे