अनिरुद्ध (बाराबंकी), 28 मार्च : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका महिलेचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी सासरच्यांनी मुलीची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर आत्महत्येचे भासवण्यासाठी त्यांनी तिला लटकवल्याची माहिती आहे. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, महिन्याभरापूर्वीच आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते. अशातच ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सासरच्या मंडळींनी ही हत्या आत्महत्या असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत महिलेच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह लखनौहून बाराबंकी येथे आणला. शहर पोलीस ठाण्यात तहरीर देताना आरोपी सासरच्या मंडळींवर कडक कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
नशेत ग्लासवर बसला व्यक्ती; थेट पोटातच शिरला, 3 दिवसांनी झाली अशी अवस्थाही घटना जिल्ह्यातील नगर कोतवाली भागातील नई बार्टी पीरबतावनची आहे. येथे राहणाऱ्या मोहम्मद रिजवानने एका महिन्यापूर्वी आपल्या मुलीचे लग्न गणेशगंज पोलिस स्टेशन, नाका जिल्हा, लखनौ येथे केल्याचा आरोप केला आहे. बाराबंकी नगर कोतवाली येथे तहरीर देताना मोहम्मद रिजवानने सांगितले की, 26/03/23 रोजी दुपारी 3:35 वाजता त्याला सासरच्यांकडून माहिती मिळाली होती की, तुमच्या मुलीने गळफास लावून घेतला आहे.
मोहम्मद रिजवानने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर आम्ही लखनऊला गेलो होतो. तिथे पोहोचल्यानंतर मुलीचा मृतदेह घेऊन आम्ही बाराबंकीला परतलो. सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्याचा आम्हाला संशय आहे.
लग्नानंतर चारच दिवसांत तरुणाचा पुन्हा मेहुणीसोबत विवाह; प्रेम नाही, ‘हे’ आहे यामागचं अजब कारणआम्हाला आमच्या मुलीचे पोस्टमॉर्टम करायचे आहे. मोहम्मद रिझवानने नगर कोतवालीत तहरीर देताना पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.