मुंबई : भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात, परंतु फार कमी प्रवाशांना रेल्वेशी संबंधित नियम आणि कायदे माहित असतील. तसेच रेल्वे संबंधीत चिन्हांबद्दल माहिती असेल. खरंतर एक सुजाण नागरिक म्हणून एका प्रवाशाला या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. कारण याची गरज केव्हा आणि कधी लागेल हे सांगता येणे कठीण आहे. असाच एक प्रश्न आहे, चला त्याबद्दल माहिती मिळवू.
रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फलकावर स्टेशनच्या नावानंतर त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची खाली का लिहिली जाते?
रेल्वे स्थानकाच्या फलकावर स्थानकाची समुद्रसपाटीपासून उंचीची माहिती देऊन त्याचा उपयोग काय, याचा विचार केला आहे का? ही माहिती प्रवाशांसाठी खरोखर आवश्यक आहे.
बांगलादेशात रेल्वेचे तीन ट्रॅक का असतात? यामागचे कारण जाणून वाटेल आश्चर्य
Mean Sea Level म्हणजे काय?
प्रत्येक रेल्वे स्थानकावर, फलाटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एक मोठा पिवळा बोर्ड असतो, ज्यावर स्थानकाचे नाव आणि त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रत्येक प्रवासी ते वाचतो. पण त्याचा वापर त्यांना माहित नसतो.
जगभरात समुद्राची समान पातळी आहे, त्यामुळे समुद्रसपाटी हा उंची मोजण्यासाठी आधार मानला जातो, इंग्रजीत याला मीन सी लेव्हल म्हणतात.
समुद्र सपाटीच्या उंचीसह ट्रेनच्या वेगाचे कनेक्शन
आम्ही तुम्हाला सांगतो की समुद्र सपाटीपासून रेल्वे स्टेशनच्या उंचीशी संबंधित माहिती प्रवाशांसाठी नसून ट्रेनच्या लोको पायलट आणि गार्डसाठी आहे. वास्तविक, यामुळे त्यांना ट्रेनचा वेग वाढवणे किंवा कमी करणे या संबंधित निर्णय घेण्यास मदत होते.
या माहितीच्या सहाय्याने, ट्रेन ड्रायव्हर सहजपणे ठरवू शकतो की त्याला एवढी चढण चढण्यासाठी इंजिनला किती शक्ती द्यावी लागेल. दुसरीकडे, ट्रेन उतारावर जाताना ड्रायव्हरला किती स्पीड असणे आवश्यक आहे आणि कोणता वेग राखणे आवश्यक आहे हे समजते. म्हणूनच सर्व स्थानकांवर 'समुद्रसपाटीपासूनची उंची' वापरली जाते.
याशिवाय रेल्वे स्थानकाच्या फलकावर लिहिलेली ही माहिती महत्त्वाची आहे कारण भारतात जेव्हा रेल्वे स्थानके बांधली जात होती, तेव्हा समुद्रसपाटीपासूनची उंचीची माहिती रेल्वे स्थानके बांधण्यात आणि रेल्वे लाईन टाकण्यासाठी उपयुक्त ठरत होती. त्याच्या आधारावर बांधकाम केल्यास पूराची समस्या टाळता येते.
भारतातील सर्वात कमी समुद्रसपाटीचे रेल्वे स्टेशन
देशातील सर्वात कमी समुद्रसपाटीच्या रेल्वे स्टेशनबद्दल बोला, ते कुट्टनाड रेल्वे स्टेशन आहे आणि ते केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यात आहे. हे स्टेशन समुद्रसपाटीपासून २.३ मीटर (-७.५ फूट) उंचीवर आहे. एवढ्या कमी उंचीमुळे हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात कमी उंचीचे आणि समुद्राच्या एकदम जवळचे रेल्वे स्थानक मानले जाते. हे स्टेशन एर्नाकुलम-कायमकुलम कोस्टल रेल्वे लाईनवर वसलेले आहे आणि येथून कोची आणि तिरुवनंतपुरमला जोडणाऱ्या ट्रेन धावतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Railway, Social media, Top trending, Viral