जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजब-गजब परंपरा : मरणापूर्वीच करावी लागते 'मृत्यू'ची तयारी; 7 वर्षांआधीच सुरू होतं प्लानिंग

अजब-गजब परंपरा : मरणापूर्वीच करावी लागते 'मृत्यू'ची तयारी; 7 वर्षांआधीच सुरू होतं प्लानिंग

अजब-गजब परंपरा : मरणापूर्वीच करावी लागते 'मृत्यू'ची तयारी; 7 वर्षांआधीच सुरू होतं प्लानिंग

जपानमध्ये सुरू असलेली ही परंपरा तीन टप्प्यात पूर्ण होत असते. या प्रक्रियेत काही लोकांचा पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातच मृत्यू होतो, तर काहींचा तीनही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मृत्यू होतो.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 मार्च : जिथे जन्म झाला तिथे तुमचा मृत्यू हा निश्चित आहे. या जगात मृत्यू अटळ आहे. एक दिवस आपल्याला मरायचे आहे हे लक्षात आल्यावर आपण मृत्यूच्या भितीने गोंधळून जातो. दरम्यान जपानमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पण जपानमधील एक वर्ग मृत्यूला घाबरत नाही, तर ते स्वतःच्या मृत्यूची तयारी आदीच करून ठेवत असतो. तेही काही मिनिटे, काही तास किंवा एक-दोन दिवस आधी नव्हे, तर जवळपास सात वर्षे अगोदरच हे लोक मृत्यूची तयारी करू लागतात.

जाहिरात

जपानमध्ये सुरू असलेली ही परंपरा तीन टप्प्यात पूर्ण होत असते. या प्रक्रियेत काही लोकांचा पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातच मृत्यू होतो, तर काहींचा तीनही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मृत्यू होतो. हा विधी करण्यासाठी कोणतीही बळजबरी किंवा दबाव टाकला जात नाही. उलट मरण पावणारी व्यक्ती स्वतःचा हे टप्पे पार करण्याची इच्छा व्यक्त करत असते. नेमका हा काय प्रकार आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

धक्कादायक! लग्नानंतर अतिघाई नवरदेवाच्या जीवावर बेतली, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू

वास्तविक, ही आश्चर्यकारक परंपरा जपानमधील आहे, जिथे बौद्ध भिक्षू सोकुशिनबुत्सु आहेत. या भिक्षूंना ममीकरण करण्याची परंपरा आहे, जी तीन वेगवेगळ्या चरणांमध्ये केली जाते आणि भिक्षूंच्या मृत्यूनंतर, त्यांच्या शरीरावर सोन्याचे पाणी मढवून त्यांचे जतन केले जाते. या परंपरेचे तीनही टप्पे पूर्ण करण्यासाठी सुमारे सात वर्षे लागतात.

जाहिरात

ही परंपरा बौद्ध भिक्खूंसाठी त्याच्या आध्यात्मिक शक्तीचे प्रदर्शन करण्याचा एक मार्ग देखील मानली जाते. यामध्ये तो स्वत:ला ममीच्या रूपात राहतात. या अनोख्या परंपरेचे पालन करणारे हे बौद्ध भिक्खू सुमारे सात वर्षे कठोर दिनचर्या पाळतात. त्यांच्या पहिल्या टप्प्यात, बौद्ध भिक्षू हजार दिवस अन्न वर्ज्य करतात आणि फक्त ड्रायफ्रुट खाऊन जगतात.

ते यशस्वीरित्या पार केल्यानंतर ते दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतात. दुसऱ्या टप्प्यात ते पुढील एक हजार दिवस विषयुक्त चहाचे सेवन करतात. हा टप्पा खूप कठीण आहे, बहुतेक लोक या टप्प्यात मृत्यू पावतात. परंतु काही लोक हा भयानक टप्पा देखील पार करतात.

जाहिरात

यानंतर ते तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतात. हा टप्पा सर्वात कठीण आणि धोकादायक मानला जातो, बौद्ध भिक्षू स्वत: ला पूर्णपणे बंद थडग्यात कैद करतात. यामध्ये श्वासोच्छवासासाठी एकच नळी बाहेर आली असते. जेणेकरून हवा आत-बाहेर जाऊ शकेल. या दरम्यान, भिक्षू दररोज समाधीमध्ये घंटा वाजवतात.

VIDEO - ‘पप्पा मम्माला मारू नका’, प्रेमाने सांगूनही ऐकले नाही; शेवटी संतप्त लेकीने चिमुकल्या हातांनी वडिलांना…
जाहिरात

जोपर्यंत ही घंटा वाजत राहते तोपर्यंत लोकांचा असा विश्वास असतो की संन्यासी जिवंत आहे आणि ज्या दिवशी ही घंटा वाजणार नाही त्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे असे मानले जाते. काही दिवसांनंतर समाधी उघडली जाते आणि भिक्षूच्या शरीराचे ममीमध्ये रूपांतर करून त्याचे जतन केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात