ललितेश कुशवाहा (भरतपुर) : देशात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात होता, परंतु भुसावर परिसरात अनोखी होळी साजरी केली जाते याची चर्चा सध्या देशभर होत आहे. दरम्यान या भागातील होळी बसंत पंचमीला सुरू होते ती पुढचे 40 दिवस चालते. त्याचबरोबर या उत्सवात वेगवेगळे खेळ ही पाहायला मिळतात. दरम्यान राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील भुसावार शहरातील होळीनिमित्त काढण्यात आलेल्या अनोख्या मिरवणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे.
लग्न न झालेल्या तरुणाला उंटावर किंवा गाढवावर बसवून बॅण्ड वाद्यांसह वेगवेगळ्या मार्गाने चौकातून मिरवणूक काढली जाते. यामध्ये वर बनलेल्या तरुणाचे वर्षभरात लग्न होते, असे सांगितले जाते. ही जुनी परंपरा आहे जी आजवर लोक पाळत आहेत. या मिरवणुकीत शहरातील सर्व नागरिक सहभागी होतात.
आता काय म्हणावं हिला! म्हणे, ‘नवरा नको, स्मार्टफोन हवा’; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला….250 वर्ष जुनी परंपरा
होळीच्या निमित्ताने अनोख्या मिरवणुकीची परंपरा जवळपास अडीचशे वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा येथील लोक आजही पाळत आहेत. भुसावरमध्ये होळीची ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक मोठ्या संख्येने पोहोचतात.
ज्या तरुणाच्या लग्नात अडचणी येत असून लग्न होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्याला होळीचा नवरा बनवून खिरकरी भगतराज त्याला उंटावर, गाढवावर बसवतात आणि डोक्यावर मडक्यात अग्नी प्रज्वलित करून वलुरी गिलुरीचा हार घालून त्याला नगरच्या विविध मार्गाने बाहेर काढले जाते.
ज्यामध्ये रंगीबेरंगी चेहऱ्यांसह मिरवणुकीतील तरुण-तरुणी हातात रंग आणि गुलाल उधळत गात आणि नाचत असतात. नगरच्या जैन मंदिरात पोहोचल्यानंतर वधूच्या वेषात आलेल्या तरुणाने तोरण मारले. या तरुणाला शगुन म्हणून पाडवेशने मारहाण केली. वधू बनलेल्या तरुणाचे वर्षभरात लग्न होते, अशी आख्यायिका आहे.