मुंबई, 25 जुलै : एक अशी घटना समोर आली आहे की ज्याबद्दल ज्याने ही ऐकलं त्याला धक्काच बसला आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी त्याचा मृत्यदेह अंत्यसंस्कारासाठी आणला तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला. खरंतर आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हा सगळा प्रकार घडून आला होता. यूपीच्या मुरादाबादमधील ही घटना आहे. इथे जेव्हा नातेवाइकांनी मृतदेह उघडून पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला. कारण त्यांना मिळालेला हा मृतदेह त्यांच्या घरातील कुंवरसेनचा नसून दुसऱ्याच पुरुषाचा आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहाची देवाणघेवाण झाल्याची माहिती नातेवाईकांना आली. हॉटेलमध्ये थांबताना बाथरुममध्ये चुकूनही ठेवू नका टूथब्रश, महिला मॅनेजरचा धक्कादायक खुलासा खरं तर, मुरादाबादजवळील बडा शहरातील बडा मंदिर परिसरात सोमवारी रात्री उशिरा एका घराचा लिंटर पडला होता. कुंवरसेन (वय ४५ वर्षे) त्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन तरुण जखमी झाले आहेत. यासोबतच पोलिसांनी पंचनामा करून कुंवरसेन यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मंगळवारी दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह शवविच्छेदन गृहातून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदन गृहातून मृतदेह घेऊन नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांनी चेहरा पाहिला तेव्हा लोकांना धक्काच बसला. कारण तो मृतदेह कुंवरसेन यांच्याऐवजी अन्य एका तरुणाचा होता. यावरून नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ज्याची माहिती स्थानिक पोलीस आणि पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. काही वेळाने चंदौसी येथील तरुणाच्या मृतदेहावरून कुंवरसेनचा मृतदेह बदलल्याचे आढळून आले. कुंवरसेन यांच्या घरी पोहोचलेला मृतदेह चंदौसीच्या तरुणाचा असून चंदौसीच्या तरुणाचा मृतदेह कुमार सेन यांच्या घरी गेला होता.
चंदौसीच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या घरी जाऊन मृतदेह पाहिला. त्यामुळे त्यांना मृतदेह बदल्याचे जाणवले. याबाबत बराच गदारोळ सुरू आहे. पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये तैनात असलेले कर्मचारी आजच्या दिवशी मृत शरीर जास्त आल्यामुळे कामाचा दबाब वाढल्याचे सांगून या प्रकरणातून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात डेप्युटी सीएमओ एसके बेनीवाल सांगतात की, पोस्टमार्टम हाऊसमध्ये दोन मृतदेह असल्याचे मला समजले, ज्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यासोबतच मृतदेहाची ओळख शवविच्छेदन गृहात कुटुंबीयांना करून दिली जाते. तसेच नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटवून देण्यात आली. पण काही चुकीमुळे ओळखणाऱ्यांनी ते चुकीचे ओळखले असल्याचे सांगितले.