जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फोन केव्हा चार्ज करावा 10, 20 की 45 टक्के? चांगल्या बॅटरी लाईफसाठी काय चांगलं?

फोन केव्हा चार्ज करावा 10, 20 की 45 टक्के? चांगल्या बॅटरी लाईफसाठी काय चांगलं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तुमच्या फोन चार्ज करण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी होतंय बॅटरीचं आयुष्य, कसं? वाचा सविस्तर

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या ती कालांतराने स्लो होते किंवा आधी आहे तशीच ती नसते. अगदी तसंच काहीसं फोनच्या बॅट्रीचं आहे. स्मार्टफोनची बॅटरी देखील कालांतराने कमकुवत होऊ लागते आणि लवकर ड्रेन होते. अशा परिस्थितीत, आपल्याला असे वाटते की आपण चुकीचा फोन निवडला आहे, परंतु तुम्हाला माहितीय का, आपल्या चुकीच्या वापरामुळे फोनची बॅटरी खराब होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं शक्य आहे? आपण असं काय चुकीचं करतो? तर चला याबद्दल जाणून घेऊ. फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे फोनला सतत चार्जिंगला लावतात किंवा थोडी बॅटरी उतरली तरी चार्ज करतात. त्यांना त्यांच्या फोनची बॅटरी नेहमी ९० टक्के किंवा जवळपास असावी असे वाटते. उदाहरणार्थ, कोणीतरी 30 मिनिटांसाठी फोन वापरला, तो 10% कमी झाला, नंतर तो 15 मिनिटांसाठी चार्ज केला आणि पुन्हा 100% चार्ज केला. बरेच लोक हा असा प्रकार करतात. जो तुमच्या फोनसाठी धोकादायक आहे. सामान्यतः, आधुनिक फोन बॅटरी (लिथियम-आयन) चे आयुष्य 2-3 वर्षे असते आणि निर्मात्याने रेट केलेले अंदाजे 300-500 चार्ज सायकल असतात. त्यानंतर, बॅटरीची क्षमता सुमारे 20% कमी होते. त्यामुळे तुम्ही लवकर फोन चार्ज करुन फोनची चार्ज सायकल लवकर कमी करतात. ज्याचा परिणाम बॅट्रीवर होतो. आता प्रश्न असा आहे की फोनच्या बॅटरीची टक्केवारी किती उरली की ती चार्जिंगवर ठेवली पाहिजे? तर बॅटरी प्लग इन करण्यापूर्वी सुमारे 20% फोनची बॅटरी होऊ द्या. वारंवार आणि अनावश्यक रिचार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होते. चांगल्या बॅटरी लाइफसाठी, तुमचा फोन कधीही 20 टक्क्यांपेक्षा कमी किंवा 80 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. जेव्हा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज केली जाते, तेव्हा ते पाहून तुम्हाला खूप बरं वाटू शकतं, परंतु बॅटरीसाठी ते खरोखर चांगले नाही. लिथियम-आयन बॅटरी पूर्ण चार्ज होणे चांगले नाही किंवा पूर्ण चार्ज झाल्यावर ती गरम होऊ लागते. हे देखील अजिबात चांगले नाही. तसेच बॅटरी चार्ज करण्यासाठी फोन पूर्णपणे 0% पर्यंत संपण्याची प्रतीक्षा करू नका. तुमचा फोन 0% पर्यंत पोहोचू देणे त्याच्या बॅटरीच्या आरोग्यासाठी चांगले नाही. कारण प्रत्येक वेळी ते चालते तेव्हा त्याच्या लिथियम-आयन सेलवर राहिलेल्या चक्रांची संख्या कमी होते, जे तुमच्या बॅट्री लाइफसाठी चांगलं नाही.

News18लोकमत
News18लोकमत

या सायकलची संख्या जितकी कमी असेल तितके कमी चार्ज ते धरू शकतात आणि बॅटरीचे आयुष्य कमी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात