अहमदाबाद, 25 फेब्रुवाारी : स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या अहमदाबादच्या पिचवर मोठी आघाडी घेण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. भारताची पहिली इनिंग 145 रनवर संपुष्टात आली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 33 रनची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी जो रुट (Joe Root) आणि जॅक लीच (Jack Leach) यांच्या माऱ्यापुढे भारताची इनिंग कोसळली. इंग्लंडचा कॅप्टन जो रुट हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला त्यानं एकही रन न देता ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला आऊट केलं. त्यापाठोपाठ एक बाजू लावून उभ्या असलेल्या आर. अश्विनची विकेट देखील त्यानं घेतली. जो रुटनं फक्त 8 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या.
Tea in Ahmedabad ☕
— ICC (@ICC) February 25, 2021
England take seven wickets for 46 runs in the first session to bowl India out for 145 👀
Joe Root gets his first five-wicket haul in Tests!#INDvENG ➡️ https://t.co/0unCGUOHmI pic.twitter.com/svXq65HrPF
तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात खराब झाली आहे. दुसऱ्या दिवशी 3 आऊट 99 या स्कोअरवरुन भारतानं पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात तीन आघाडीचे बॅट्समन आपले आऊट झाले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 7 रन काढून सर्वप्रथम आऊट झाला. त्याला जॅक लीचनं आऊट केलं. (हे वाचा- सूर्यकुमार यादवनं 26 बॉलमध्ये काढले 120 रन! मुंबईनं केला सर्वात मोठा स्कोअर ) अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर जॅक लीचनं रोहित शर्माला (Rohit Sharma) आऊट करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. रोहितनं अहमदाबादच्या फिरत्या पिचवर 66 रन काढले. सुरुवातीपासून आत्मविश्वासनं खेळणाऱ्या रोहितचा लीचला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि तो आऊट झाला. आत्मविश्वासानं खेळणारा रोहित आऊट झाल्यानंतर इंग्लंडनं मॅचमध्ये कमबॅक केलं. त्यांच्या स्पिनर्सनी अचूक मारा करत भारताला मोठी आघाडी मिळवू दिली नाही. आता दुसऱ्या इंग्लंडमध्ये इंग्लंडला झटपट आऊट करण्याचं आव्हान टीम इंडियापुढे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला ही टेस्ट गमावून चालणार नाही. तर इंग्लंडला ही टेस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे या टेस्टमधील उर्वरित दोन इनिंग अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.