मुंबई, 12 मार्च : कोरोना व्हायरसचा विळखा जगभरात वाढत असतानाच बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं बुधवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जगभरात 100 देशांमध्ये जवळपास कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आशिया इलेव्हन संघात खेळल्या जाणाला टी-20 सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सामने कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याचं बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
आशिया आणि वर्ल्ड इलेव्हेन या दोन्हीत 21 आणि 22 मार्च रोजी टी20 सामने खेळवले जाणार होते. हे सामने रद्द करण्यात आले आहेत. जगभरात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता खेळाचे अनेक इव्हेंट्स स्थगित करण्यात आले आहेत.
बीसीबी प्रमुख नजमुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हे सामने स्थगित करण्यात आले आहेत.
Bangladesh Cricket Board: The Mujib 100 events organised by the Bangladesh Cricket Board (BCB) to commemorate the Birth Centenary of Bangabandhu Sheikh Mujibur Rahman have been postponed as a precautionary measure in light of the Coronavirus Disease situation worldwide. pic.twitter.com/4zibTWCNR2
— ANI (@ANI) March 12, 2020
The Mujib 100 events organised by the Bangladesh Cricket Board (BCB) to commemorate the Birth Centenary of Bangabandhu Sheikh Mujibur Rahman have been postponed as a precautionary measure in light of the Coronavirus Disease situation worldwide.https://t.co/6I8eckKzkI
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 11, 2020
हे वाचा-अजब लॉजिक! विराट-सेहवागमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पराभव
IPLवरही कोरोनाचं सावट
कोरोना व्हायरसमुळे IPL 2020 सुद्धा सध्या संकटात सापडलं आहे. कारण IPL 2020 ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर IPL रद्द केलं जाण्याची शक्यताही व्यक्त केलं जात आहे. कारण IPL वर बंदी घालण्यासाठी हायकोर्टात याचिका मद्रास कोर्टात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारीच IPL 2020 चे सामने पुढे ढकलण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टातसुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत IPL रद्द होणार की नाही? याबाबत सौरव गांगुली मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. त्यांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोरोनानं जगभरात हाहाकार पसरला आहे. या व्हायरसनं आता भारतातही जवळपास 4 ते 5 राज्यांमध्ये घुसखोरी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना महारोगराईची घोषणा केली आहे. आतापर्यंत 100 देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 65 च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेलेल आतापर्यंत 11 रुग्ण आढळले आहेत.
तर जगभरात 100 देशांमध्य हजारांच्या संख्येनं कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये चीन पाठेपाठ आता इराणचाही समावेश झाला आहे.
देशभरातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहून केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीसाठी 15 एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसाही बंद करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून लागू होणार आहे. यासोबतच चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून 15 फेब्रुवारीनंतर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस स्वतंत्र कशात ठेवण्यात येणार आहे.
हे वाचा-'कोरोना'मुळे IPL रद्द होणार? 48 तासांत सौरव गांगुली मोठा निर्णय घेण्याची शक्यता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Sports, T-20 cricket