मुंबई, 28 मे: इंद्रजालाचे नाव ऐकल्यावर असे वाटते की कदाचित ही काही मायावी गोष्ट आहे, काही लोक तिला जादूटोण्याशी जोडतात, तर बरेच लोक त्याचा संबंध वश आणि संमोहनाशी जोडतात. इंद्रजालला पर्शियन भाषेत “तिलिस्म” म्हटले गेले आहे, भारतात तिलिस्म हा शब्द जादूसाठी वापरला जातो. इंद्रजाल हे समुद्रातील वनस्पती आहे, ज्याला पाने नसतात, ही सहजासहजी मिळत नाही, असे म्हणतात की ज्या घरात इंद्रजाल असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही.
इंद्रजालचे फायदे अपत्यप्राप्तीसाठी, शत्रूचे अडथळे टळण्यासाठी, नेत्रदोष दूर करण्यासाठी इंद्रजालचा उपयोग लाभदायक ठरतो. शास्त्रानुसार ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते, तेथे याचा वापर आवर्जून करतात. घरातील मंदिरात इंद्रजाल ठेवल्याने वाईट नजर लागत नाही. नवरात्री, होळी, दिवाळी यांसारख्या शुभ प्रसंगी जर इंद्रजल मंत्रपूर्वक धारण केले किंवा कामाच्या ठिकाणी ठेवले, त्याला लाभ होतो. घराच्या मुख्य दारावर इंद्रजल लावल्याने नकारात्मक शक्तींचा घरात प्रवेश होत नाही आणि वास्तुदोष नष्ट होतात. दुकान, व्यवसायाचे ठिकाण दक्षिण दिशेला इंद्रजाल लावल्याने व्यवसायात प्रगती होते. बऱ्याचदा इंद्रजाल हे जादूटोण्याशी जोडले जाते, पण वैद्यक क्षेत्रातही ते जीवनरक्षकाचे काम करते. यकृताचे गंभीर आजार आणि पुरूषांच्या प्रोस्टेटच्या समस्या आणि कर्करोगावरही हे अत्यंत उपयुक्त औषध आहे. इंद्रजालाची पूजा वास्तविक इंद्रजालाची तांत्रिक ग्रंथानुसार पूजा केली जाते, इंद्रजालाची पूजा करण्यासाठी गंगाजल, अक्षत, कुमकुम, कलव, लाल वस्त्र, तूप, मातीचे दिवे, अष्टगंध, काळी हळद, अगरबत्ती, ताजी फुले इत्यादींचा वापर करतात. अत्तराच्या या उपायांनी जीवन होईल सुगंधित, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा इंद्रजालाच्या पूजेसाठी मंगळवार आणि शनिवार हे सर्वात शुभ दिवस मानले जातात, यासाठी घरातील मंदिरासमोर लाल आसन टाकून इंद्रजालाच्या शुद्धीकरणासाठी गंगेचे पाणी 7 वेळा शिंपडावे, त्यानंतर 5 वेळा दिवा लावावा. 7 तुपाचे दिवे, उदबत्ती इंद्रजालासमोर ठेवा, नंतर अष्टगंध, काळी हळद आणि कुंकुममध्ये गंगाजल मिसळून मिश्रण तयार करा आणि इंद्रजालाभोवती आणि मध्यभागी 11 किंवा 21 वेळा टिळा लावा आणि खालील मंत्राचा जप करा: ।। ॐ नमो नारायणाय विश्वम्भराय इंद्र जाल कौतुक निर्देशाय दर्शनं कुरु स्वाहा।। मंत्राचा उच्चार केल्यानंतर इंद्रजाल लाल कपड्यात बांधून घरातील मंदिरात ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणी स्पर्श करू शकणार नाही. यामुळे घरात सकारात्मकता राहील, वास्तुदोष नष्ट होतील, अशी धार्मिक मान्यता आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)