most expensive hotel in india:भारतात एकापेक्षा एक जबरदस्त हॉटेल्स आहेत. जे आपल्या सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्या आलिशान हॉटेलविषयी सांगणार आहोत जे भारतातील एका शहरात आहे आणि आपल्या सौंदर्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
आपण राजस्थानची राजधानी जयपूरविषयी बोलत आहोत. येथे भेट देण्यासारखी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. जिथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. आजही असे अनेक किल्ले आणि राजवाडे आहेत, ज्यांना पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात, तर काही किल्ले असे आहेत ज्यांचे आता हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे.
यामधील एक म्हणजे रामबाग पॅलेस. ज्याची गणना भारतातील सर्वात महागड्या हॉटेल्समध्ये केली जाते. या हॉटेलला संपूर्ण भारताची शान म्हटलं जातं. याला प्रतिष्ठित ट्रॅव्हल प्लस लेझर इंडियाज बेस्ट अवॉर्ड्स 2021 मध्ये बेस्ट लक्झरी हॉटेलचा किताब मिळालाय. या मॅगझिनच्या वाचकांच्या मतांच्या आधारे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
हा सुंदर महल जयपूरच्या राजाचे निवासस्थान होते. जे 1835 मध्ये बांधले गेले होते. त्यानंतर 1925 मध्ये रामबाग पॅलेस हे जयपूरच्या महाराजांचे कायमचे निवासस्थान बनले. यानंतर 1957 मध्ये महाराजा सवाई मान सिंह यांनी या पॅलेसचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर केले.
हा महाल 47 एकरमध्ये पसरलेला आहे. ज्यामध्ये अनेक आलिशान सूट, संगमरवरी कॉरिडॉर, हवेशीर व्हरांडा आणि भव्य बागा आहेत. दुसरीकडे, जर आपण हॉटेलच्या भाड्याबद्दल बोललो तर, त्याच्या वेगवेगळ्या खोल्या आणि सूटचे भाडे 2.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच यात थांबण्यासाठी सामान्य माणसाला आपले खाते रिकामे करावे लागेल.