लोकांच्या आयुष्यात रिटायरमेंटनंतर अनेक आर्थिक समस्या येतात. कारण लोक आपली बचत योग्य ठिकाणी गुंतवत नाही. पैसे वेळेत योग्य ठिकाणी गुंतवले तर पुढचे आयुष्य योग्य प्रकारे घालवता येते.
भारतीय आयुर्विमा महामंडळ रिटायरमेंटनंतरही लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी अनेक पॉलिसी चालवत आहे. या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करून, लोक स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बचत करू शकतात.
LIC ची न्यू जीवन शांती योजना ही रियाटरमेंटनंतर बेस्ट असते. या योजनेत किमान 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. दुसरीकडे, जर तुम्ही या योजनेत 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला आयुष्यभर दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल.
LIC च्या सरल पेन्शन योजना : LIC च्या या योजनेचे लाभार्थी वर्षाला किमान 12000 रुपयांची वार्षिकी खरेदी करू शकतात. या योजनेतही गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. 40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक ही पेन्शन योजना खरेदी करू शकतात.
18 ते 55 वर्षे वयोगटातील लोक एलआयसीच्या जीवन लक्ष्य योजनेत गुंतवणूक करू शकतात. एलआयसीच्या या योजनेचा कालावधी 13 ते 25 वर्षांचा आहे. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी बनवण्यात आली आहे.
LIC ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो तसेच पैशाची सुरक्षितता, त्यामुळे लोक यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानतात.