आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काकडीत पौष्टिक घटक आढळतात. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. काकडीत देखील एक गुणधर्म आहे, जो व्हिटॅमिन सीच्या शोषणात व्यत्यय आणतो. त्यामुळे टोमॅटो आणि काकडी एकत्र न खाण्याचा सल्ला दिला जातो.
तज्ज्ञांनुसार, काकडी आणि टोमॅटोच्या मिश्रणामुळे शरीरात आम्ल तयार होते आणि सूज येते. कारण पचनाच्या वेळी प्रत्येक अन्नाची वेगवेगळी प्रतिक्रिया असते. काही पदार्थ सहज पचण्याजोगे असतात. तर काही आहार पचायला वेळ लागतो. या दोन गोष्टींचे मिश्रण केल्याने गॅस, पोटदुखी, थकवा येऊ शकतो.
सॅलडमध्ये काकडी आणि टोमॅटो एकत्र केल्याने दीर्घकाळापर्यंत चयापचय पातळी कमी होते. कारण सॅलडमधील प्रत्येक घटक पचायला वेगळा वेळ लागतो. पचनाच्या वेळी अन्नाचे रेणू तुटत असताना ही प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची होते.
एकीकडे काकडी पोटाला हलकी असते आणि पचायला कमी वेळ घेते. तर दुसरीकडे टोमॅटो आणि त्याच्या बिया पचायला जास्त वेळ लागतो. जेव्हा दोन भिन्न पदार्थ एकत्र मिसळले जातात तेव्हा किण्वन प्रक्रियेतून वायू आणि द्रव बाहेर पडतात. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
म्हणूनच आपण सॅलडमध्ये काकडी आणि टोमॅटो एकत्र पाहताना काळजी घ्यायला हवी. कारण यामुळे बऱ्याचदा लाभ मिळण्याऐवजी आरोग्याला हानी होण्याची शक्यता जास्त असते.