1.कमलादेवी चटोपाध्याय (Kamaladevi Chattopadhyay)- कमलादेवींचं भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान महत्त्वाचं आहे. सत्याग्रहामध्ये महिलांचा समावेश करावा अशी विनंती कमलादेवी यांनीच महात्मा गांधींना केली होती. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. 1942 मध्ये त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा झाल्या.
3. भीकाजी कामा (Bhikaiji Cama)- भिकाजी कामा या परदेशात भारतीय ध्वज फडकवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. आजारपणामुळे 33 वर्षे भिकाजी भारतापासून दूर राहिल्या, पण दूर राहूनही त्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न कायम राहिले. युरोपातील विविध देशांमध्ये जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा देत राहिल्या. त्यांनी पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना केली आणि त्यात वंदे मातरम् हे क्रांतिकारी मासिक काढले.
4. अॅनी बेझंट (Annie Besant)- अॅनी बेझंटचा जन्म लंडनमध्ये झाला असला तरी 1893 मध्ये भारतात आल्यानंतर त्या इथेच राहिल्या. 1917 मध्ये बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. न्यू इंडिया या वृत्तपत्राद्वारे त्यांनी ब्रिटीश सरकारकडे भारतात स्वराज्याची मागणी केली. बेझंट यांनी 1916 मध्ये भारतात होमरूल चळवळ सुरू केली.
5. अरुणा असफ अली (Aruna Asaf Ali)- अरुणा असफ अली यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केलं. मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवून त्यांनी तरुणांना प्रेरीत केलं. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. अरूणा असफ अली यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ‘ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणूनही ओळखले जाते.