पूजाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने तिच्या दुसऱ्या लग्नावरही मोकळेपणाने संवाद साधला आहे. ती म्हणाली, "असं तर महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, कोणत्याही बाबतीत पुरूषांच्या मागे नाहीत. पण या गोष्टीने काहीच फरक पडत नाही जेव्हा ती यशस्वी स्त्री आपल्या घरी पोहोचते. तेव्हा लोक म्हणतात हा ठिक आहे तु नोबल प्राईज जिंकलीस, पण जेवण्यासाठी काय आहे? तु एक आई आहेस की नाही? तुझं लग्न झालं आहे का?"
याविषयी बोलताना ती म्हणाली, "मला अनेकांनी विचारलं की तू दुसरं लग्न का करत नाहीस. तेव्हा मी त्यांना सांगते की फक्त आनंदात राहत होते एव्हढचं महत्त्वाचं नाही. कारण नेहमी खूश राहा हे जास्त महत्त्वाचं आहे. हे माझ्यासोबत घडलं आहे. आणि मी लोकांनाही हाच सल्ला देण्याचा प्रयत्न करते. यावाचून माझं जीवन अधुरं नाही. कारण माझं जीवन कसं जगायचं हे मी ठरवते."