टेलिव्हिजनचा प्रसिद्ध शो बालिका वधू फेम अभिनेत्री हंसी परमारन नुकतंच लग्न केलंय. ग्वालियरच्या आकाश श्रीवास्तवबरोबर हंसीनं लग्नगाठ बांधली. ग्वालियरमध्ये दोघांचा विवाह सोहळा झाला. अभिनेत्री अनेक वर्ष मुंबईत राहतेय. बॉयफ्रेंडबरोबर अखेर तिनं लग्न केलं. हंसी परमार 'बालिका वधू', 'गीत हुई सबसे पराई', 'काली', 'एक अग्निपरीक्षा' सारख्या मालिकेत तिनं काम केलं आहे. त्याचप्रमाणे 'रन बेबी रन', 'खिलाडी नं. 201', 'फोर्टी प्लस', 'जूनून', 'विशुद्ध और काला धनी', 'धमाल' सारख्या सिनेमातही तिनं काम केलं आहे. महाराष्ट्रात तिनं करिअर केलं मात्र लग्नानंतर आता मध्यप्रदेशच्या ग्वालियरची ती सून झाली आहे. नवऱ्याच्या घरी ती कायमची शिफ्ट होणार आहे. दोघांना त्यांचं लग्न फिल्मी स्टाइल करायचं होतं त्यांची ही इच्छा अखेर त्यांनी पूर्ण केली. हंसी आणि आकाश यांचा एक अल्बम देखील रिलीज होणार आहे.