आजच्या काळात शेतकऱ्यांना आपापल्या परीने काहीतरी खास लागवड करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ते आपल्या उत्पन्नात वाढ शोधत आहेत. शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शिक्षणामुळे हल्ली ते शेतीत तंत्रज्ञान, इतर परदेशी व देशी विशेष बियाणे वापरत आहेत.
पारंपरिक पद्धतीने आता शेती न करता शेतकरी थोडं आधुनिक थोडं वेगळ्या प्रकारची शेती करण्याकडे वळत आहेत. तुम्ही बाजारात नासपती किंवा पेर खात असाल तर त्या पेरची शेती देखील तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते. हा नुसता विचार नाही प्रत्यक्षात एका शेतकऱ्याने हा प्रयोग केला आणि आज तो लाखो रुपये कमवत आहे.
या फळाची लागवड उष्ण आर्द्र उष्णकटिबंधीय मैदानापासून कोरड्या समशीतोष्ण व उंच प्रदेशापर्यंत केली जाते. फळांच्या उच्च उत्पादनासाठी कमीत कमी तापमान १० ते २५ डिग्री सेल्सियस असायला हवं. लागवडीसाठी जमीन मध्यम पोत असलेली वाळूची दोमट व खोल माती उत्तम मानली जाते. जमिनीचे पीएच मूल्य ७ ते ८.५ दरम्यान असावे. याची लागवड प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आहेत.
नासपातीच्या नवीन जातींमध्ये लेक्सटन सुपर्ब, थंब पियर, शिंसुई, कोसुई, सेंसेकी, अर्ली चायना, काश्मिरी नाशपाती आणि डायने डिओकोमिस इत्यादींचा समावेश आहे. गहू, हरभरा, बटाटा, वाटाणा, बाराबत्ती, कांदा, तीळ, गहू, हळद, आले आणि भाजीपाल्याची लागवड नाशपातीसह रब्बी हंगामात करता येते. नाशपातीच्या लागवडीत फळे येईपर्यंत उडीद, मूग, हरभरा या पिकांची लागवड करता येते.