या भागातील नागरिक व ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात येणार आहे. किनारी भागात उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर पावसाचा धोका असल्यानं किनारी भागातील ग्रामस्थांचं स्थलांतर केलं जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु, औषधांचा साठा करून ठेवावा आणि बाहेर पडणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. (वाचा-डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन) पुराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना बांधून ठेऊ नये, बोटी सुसज्ज ठेवणे, कुशल मनुष्यबळ तैनात ठेवणे, लाईफ बोटी यासह इतर सामग्रीची तयारी करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली आहे. कोविड सेंटरच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास जनरेटर पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसंच ऑक्सिजन बफर साठा देखील ठेवण्यात येणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत तुटवडा जाणवू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. गरज पडल्यास लगेच मदत करण्यासाठी बचाव पथकांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता; जिल्ह्यात कर्फ्यु लावणार: जिल्हाधिकारी#Ratnagiri #Rainfall #रत्नागिरी #पाऊस pic.twitter.com/nA303PMDpC
— News18Lokmat (@News18lokmat) June 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Rain, Ratnagiri, Weather, Weather forcast