मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय

मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय

मुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे.

मुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे.

मुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे.

मुंबई, 31 जुलै : राज्यावर सध्या कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था रुग्णांच्या मदतीसाठी कामाला लागली आहे. हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी घडाळाच्या काट्यावर फिराणारी ही मुंबई एका क्षणात ठप्प झाली. पण मुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे.

मुंबईकरांना लवकरच पाणीकपतीला सामोरं जावं लागणार आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत शनिवारपासून 20 टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा खूप कमी आहे. मागच्या दोन वर्षात यावेळेला सर्वात कमी पाणीसाठा असल्यानं प्रशासन पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकतं.

या महिन्याच्या शेवटापर्यंत वाट पाहून प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती याआधीही समोर आली होती. त्यामुळे मुंबईकरांनो पाण्याचा योग्य वापर करा आणि पाणी वाया घालवू नका अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 4.9 लाख दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा आहे. जी ही जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या 34% इतका आहे.

एका मुलासह 2 मुलींनी क्षणात गमावला जीव, खेळताना घडली धक्कादायक घटना

दरम्यान, गेल्या वर्षी 30 जुलै 2019 रोजी एकूण 82% पाणीसाठा होता. यंदा मात्र हा साठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे खरंतर, मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची गरज आहे. गेल्या काही दिवसांआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तलावं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी प्रश्नालाही तोंड द्यावं लागणार आहे.

कोणत्या तलावात किती पाणीसाठा आहे आणि मागच्या वर्षी तो किती होता?

मुंबईत काही दिवसांआधी पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा ( दशलक्ष लिटर मध्ये)

तलाव- अप्पर वैतरणा

यावर्षी पाणीसाठा- 20 हजार 586

मागच्या वर्षी- 31हजार 435

तलाव- मोडक सागर

यावर्षी पाणीसाठा- 48 हजार 568

मागच्या वर्षी- 1 लाख 4 हजार

तलाव- तानसा

शे किंवा हजार नाही; तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाखांचं बिल

यावर्षी पाणीसाठा- 34 हजार 640

मागच्या वर्षी- 1 लाख 22 हजार 404

तलाव- मध्य वैतरणा

यावर्षी पाणीसाठा- 54 हजार 220

मागच्या वर्षी- 1 लाख 40 हजार 101

तलाव- भातसा

यावर्षी पाणीसाठा- 2 लाख 33 हजार 680

मागच्या वर्षी- 3 लाख 55 हजार 964

तलाव- विहार

यावर्षी पाणीसाठा- 16 हजार 687

मागच्या वर्षी- 16 हजार 207

तलाव- तुळशी

यावर्षी पाणीसाठा- 7 हजार 949

मागच्या वर्षी- 8 हजार 11

First published: