मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /पुणेकरांसाठी ALERT, पूल पाण्याखाली जाणार असल्याने या भागातून प्रवास करणं टाळा

पुणेकरांसाठी ALERT, पूल पाण्याखाली जाणार असल्याने या भागातून प्रवास करणं टाळा

या भागातून प्रवास करणं टाळा आणि पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी अशी सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

या भागातून प्रवास करणं टाळा आणि पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी अशी सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

या भागातून प्रवास करणं टाळा आणि पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी अशी सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

पुणे, 13 ऑगस्ट : राज्यात आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांना पाणीपुरवठा करणारी अनेक धरणं भरून वाहत आहेत. अशात खडकवासला धरणातून सायंकाळी 7 वाजतापासून मुठा नदी पात्रात 16 हजार 478 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं असून यामुळे भिडे पूल आणि नदी पात्रातील रस्ता पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणं टाळा आणि पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी अशी सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.

15 ऑगस्टवर आसमानी संकट, 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

15 ऑगस्टवर आसमानी संकट, 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

15 ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे. येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडीही कोसळू शकतात अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगष्टमध्ये माञ जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

बैलगाडा शर्यतबंदी उठण्यावर महत्त्वाची बैठक, काय म्हणाले अमोल कोल्हे

राज्यातील पाऊसमान

- गेल्या 15 दिवसात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस

- नगर, औरंगाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

- तर नंदूरबार, अकोला, यवतमाळ, अमरावती, गोंदियात माञ सरासरी पेक्षा कमी पाऊस

- पण 13 ते 17 ऑगष्टपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज

या दुसऱ्या स्पेलमध्ये विशेषत: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेचे संशोधक डॉ. अनुमप कश्यपी यांनी व्यक्त केला आहे. कृष्णा-भीमा खोऱ्यातली धरणंही आता भरू लागली आहेत. कृष्णा खोऱ्यातील धरणं 75 टक्के तर भिमा खोऱ्यातील धरणं 65 टक्के भरलीत.

अनैतिक संबंधातून रचला धक्कादायक हत्येचा कट, डोक्यात दगड घालून केलं खल्लास

उजनी मात्र अजूनही 30 टक्क्यांवर आहे तर जायकवाडी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याआधीच 60 टक्के भरलं आहे. त्यामुळे एका अर्थाने पावसाने यावेळी मराठवाड्याचा अनुशेषच भरून काढलाय असं म्हणावं लागेल.

दरवर्षी साधारणपणे नगर, सोलापूर हे पर्जन्यछायेचे जिल्हे नेहमीच दुष्काळी राहतात. पण यावेळी नेमक्या याच जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला आहे. हे यंदाच्या मान्सूनचं खास वैशिष्ठच म्हणावं लागेल.

तसंच जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्टमधील मोठ्या पुराचा धोकाही काही प्रमाणात टळला आहे आणि वरून सध्याच्या पावसाने बहुतांश धरणंही भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Pune, Pune news