नवी दिल्ली, 28 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत आहे. त्यामुळं त्यानंतर लॉकडाऊन वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष असताना सध्या कॅबिनेट सचिव राजीव गौबा आज सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. प्रथमच कोरोनाबाधित महानगरांचे महानगरपालिका आयुक्तही या बैठकीस हजेरी लावतील. 11.30 वाजल्यापासून ही बैठक सुरू होईल. विशेष म्हणजे लॉकडाऊन चार संपण्यापूर्वी पुन्हा एकदा लॉकडाउन -5 लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. सूत्रांचे म्हणणे की मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आठवडे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. या लॉकडाऊनमध्ये सरकार जनजीवन आणि अर्थव्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमध्ये सूट देण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन 5 चे 11 शहरांमध्ये कडक निर्बंध असतील. ही अशी शहरे आहेत जिथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. वाचा- चौथा लॉकडाऊन संपण्याआधीच Lockdown 5.0 चे संकेत; ही 11 शहरं राहणार बंद? देशात रोज 7 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं आता सरकार 31 मार्चनंतर काय करणार, याकडे सर्वांचे लश्र लागले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो, तर इतर शहरात हा कालावधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो. वाचा- 31 मेनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार? असा असेल सरकारचा नवा प्लॅन ही आहेत 11 शहरं दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता या शहरांमध्ये लॉकडाऊन कायम असू शकतो. या 11 शहरांमध्ये, कोरोना संक्रमित झालेल्यांपैकी 70 टक्के रुग्ण सापडले आहेत, तर अहमदाबाद, दिल्ली, पुणे, कोलकाता आणि मुंबईमध्ये हे अधिक धोकादायक आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण येथे आढळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.