जाहिरात
मराठी बातम्या / देश / 31 मेनंतर लॉकडाऊन वाढणार की नाही? अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

31 मेनंतर लॉकडाऊन वाढणार की नाही? अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असून कायम चर्चेत असतात. हे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसह अन्य अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतात. अभिनेता विद्युत जामवालही सध्या अशाच कारणांनी सोशळ मीडियावर चर्चेत आहे..

बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असून कायम चर्चेत असतात. हे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसह अन्य अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतात. अभिनेता विद्युत जामवालही सध्या अशाच कारणांनी सोशळ मीडियावर चर्चेत आहे..

31 मेनंतर या लॉकडाऊनचा कालावधी संपणार असून काही शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 मे : देशात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन संपण्याचा कालावधी 31 मे असून, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 31 मेनंतर लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो अशा चर्चा असताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी लॉक़डाऊनबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी गृह मंत्र्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर काय केले जाऊ शकते, यांवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांकडून कोणत्या क्षेत्रात सूट दिली जाऊ शकते, याबाबत सल्लेही घेण्यात आले. देशात 17 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा (Lockdown 4.0) सुरु आहे. 31 मेनंतर या लॉकडाऊनचा कालावधी संपणार असून काही शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. याआधी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी लॉकडाऊन 5.0 मध्ये काही विशेष सवलती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर, 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. सूत्रांचे म्हणणे की मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 दिवस लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. वाचा- कोरोनामुळे मृत्यू रात्रभर कुटुंबीयांनी व्यक्त केला शोक आणि अचानक… या 11 शहरांमध्ये असतील नियम कडक या लॉकडाऊनमध्ये सरकार जनजीवन आणि अर्थव्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमध्ये सूट देण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन 5 चे 11 शहरांमध्ये कडक निर्बंध असतील. ही अशी शहरे आहेत जिथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता या शहरांमध्ये लॉकडाऊन कायम असू शकतो. या 11 शहरांमध्ये, कोरोना संक्रमित झालेल्यांपैकी 70 टक्के रुग्ण सापडले आहेत, तर अहमदाबाद, दिल्ली, पुणे, कोलकाता आणि मुंबईमध्ये हे अधिक धोकादायक आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण येथे आढळले आहेत. वाचा- पुणे कोरोनानं हादरलं, कामगाराच्या अचानक मृत्यूनंतर आला धक्कादायक रिपोर्ट या क्षेत्रांना मिळू शकते सूट या नव्या लॉकडाऊनमध्ये जीम आणि मंदिरांना सुट दिली जाऊ शकते. मात्र मॉल्स, शाळा, कॉलेजेस यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही असे संकेत केंद्राने दिली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मंदिरांमध्ये प्रार्थना किंवा धार्मिक कार्य़क्रम करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात