भारतात कोरोनाचा प्रसार होत असला तरी, काही राज्यांत मृत्यू दर कमी झाला आहे. गेल्या 24 तासांत पहिल्यांदाच 260 लोक ठणठणीत बरे होऊन घरी परतले. यामुळे एकाच दिवशी निरोगी होण्याचा दर 13 टक्क्यांनी वाढला. आतापर्यंत भारतात 1,748 रुग्ण बरे झाले आहेत. तर, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 387 वर पोहचली आहे. भारतात कोरोनामुळे मृतांचा आकडा 437 इतका झाला आहे. हे वाचा : भारताला सगळ्यात मोठं यश, 24 तासांत 260 रुग्णांनी कोरोनावर केली मात राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांनी वेळीच खबरदारी घेत लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे या राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. आरोग्य मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्यांने सांगितले की, पुढचा आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे. कोरोना संशयितांची आता वेगाने चाचणी घेण्यात येत आहे. श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या अशा सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. हे वाचा : मेच्या पहिल्या आठवड्यात मिळणार चांगली बातमी, गृह मंत्रालयाने दिले संकेत संपादन - सूरज यादवWith 1,007 more cases, India's COVID-19 count reaches 13,387
— ANI Digital (@ani_digital) April 17, 2020
Read @ANI story | https://t.co/XWcEApF093 pic.twitter.com/jwoh23fMPr
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus