भारताला लॉकडाऊनचा फायदा राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांनी योग्यवेळी लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. या राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घटली आहे. आरोग्य मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्यांने सांगितले की, पुढचा आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे. कोरोना रूग्णांची आता भारतात वेगाने चाचणी घेण्यात येत आहे. श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या अशा सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. मेच्या पहिल्या आठवड्यानंतर येणार खूशखबर येत्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी, कोरोना चाचणी जसजशी वाढेल तसतशी लोकांची संख्याही वाढेल. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. देशातील कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा 12 हजारांच्या पुढे गेला असताना लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या कालावधीत 36 हजार लोकांना सरकारी रुग्णालयात किंवा घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. संपादन-प्रियांका गावडे.With 1,007 more cases, India's COVID-19 count reaches 13,387
— ANI Digital (@ani_digital) April 17, 2020
Read @ANI story | https://t.co/XWcEApF093 pic.twitter.com/jwoh23fMPr
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona