दुसरीकडे, दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्यानंतरही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. मंगळवारी दोन्ही देशांमधील विभागीय कमांडर पातळीवर बैठक झाली. या विषयावरील विभागीय कमांडर स्तराची ही तिसरी बैठक होती. यापूर्वी ब्रिगेडिअर आणि कर्नल रँक अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. मात्र सीमेवरचा तणाव वाढतच आहे. वाचा-लडाखमध्ये तणाव! डोकलामनंतर पहिल्यांदाच भारत-चीनमध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता डोकलामपेक्षा दीर्घकाळ चालणार वाद 2017 मध्ये डोकलाम तिराहा प्रदेशात भारत आणि चीनच्या सैन्यांदरम्यान 73 दिवस चकमक सुरू होती. एवढेच नाही तर दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारत-चीन यांच्यात 3 हजार 488 किमी लांब वास्तविक नियंत्रण रेषेसह (LAC) आहे. मात्र या सीमेवरून गेली कित्येक वर्ष भारत आणि चीनमध्ये वाद आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिणेकडील तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे, तर भारतानं हा आपलाच अविभाज्य भाग असल्याचे म्हटलं आहे. भारत-चीन वादावर काय तुमचं मत View SurveyCan GOI please confirm that no Chinese soldiers have entered India?https://t.co/faR5fxEqQO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Rajnath singh