नवी दिल्ली, 19 जून : जम्मू आणि काश्मीरमधल्या मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपनं काढला आहे. भाजपचे जम्मू आणि काश्मीरचे प्रभारी राम माधव यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूकीनंतर पीडीपीला भाजपने पाठिंबा दिला होता.
जम्मू आणि काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून परिस्थिती नियंत्रणात राखण्यास राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप राम माधव यांनी केला. अशा परिस्थितीत सरकारमध्ये राहणं भाजपला शक्य नाही. त्यामुळे देशहिताचा विचार करता भाजपने हा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा
अनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे, इरफाननं चाहत्यांना लिहिलं वेदनादायी पत्र
भयंकर! नागपूरमध्ये गुप्तधनासाठी केला बहीण आणि कुटुंबाचा खून
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराने शस्त्रसंधी केली होती. मात्र त्याला हुर्रियत आणि इतर संघटनांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आता लष्कराची कारवाई पुन्हा सुरू होणार आहे.
जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या एकून 87 जागा असून त्यात पीडीपीला 26, भाजपला 25, नॅशनल कॉन्फरन्सला 15 तर काँग्रेसला 12 जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस आणि एनसीनं पीडीपीला पाठिंबा दिला तर मेहबुबा सरकार वाचू शकतं मात्र ही शक्यता कमी असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
#WATCH BJP addresses the media in Delhi https://t.co/6QF3wL2Xdz
— ANI (@ANI) June 19, 2018