'माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, यासाठी आपण राजीनामा दिला आहे.', असं खासदार मनसुख वसावा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. खासदार मनसुख वसावा यांनी पत्रात म्हटलं आहे की, पक्षावर माझी निष्ठा आहे. मी प्राणाणिकपणे पक्षाचं काम केलं. सोबतच पक्ष आणि जीवनाचा सिद्धांत याचं काटेकोरपणे पालक करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी एक माणूस आहे. माणसाकडून चूक होतच असते. माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, म्हणून आपण राजीनामा देत आहे, लोकसभेचं कामकाज सुरू होण्याआधीच आपण खासदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं मनसुख वसावा यांनी म्हटलं आहे. हेही वाचा...रजनीकांत यांची राजकीय मैदानातून माघार, हे आहे कारण दरम्यान, खासदार मनसुख वसावा हे नुकतेच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना देखील खासदार वसावा यांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहिलं होतं. 'गुजरातमध्ये आदिवासी महिलांची तस्करी होत आहे.', असं ते म्हणाले होते. त्याचबरोबर स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या बाबतही खासदार वसावा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा परिसर इको-सेंसेटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी खासदार वसावा यांनी केली होती.Gujarat: BJP Bharuch MP Mansukh Vasava resigns from the party.
— ANI (@ANI) December 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.