मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यात कोरोनामुळे उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या

राज्यात कोरोनामुळे उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 6 लाख 15 हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 56 हजार लोक उपचार घेत आहेत.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 6 लाख 15 हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 56 हजार लोक उपचार घेत आहेत.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 6 लाख 15 हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 56 हजार लोक उपचार घेत आहेत.

मुंबई 18 ऑगस्ट: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच मंगळवारी उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी राज्यात 11 हजार 119 नवे रुग्ण आढळले. तर 9 हजार 356 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 6 लाख 15 हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 56 हजार लोक उपचार घेत आहेत.

राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे चिंता वाढली आहे. तर कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाणही वाढत आहे. जे रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यांच्यात आता नवं लक्षण दिसत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. थकवा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही नवी लक्षणे आढळून येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र दुखणं अंगावर काढू नका असा सल्लाही राजेश टोपे यांनी दिला.

ते म्हणाले, जे दुरुस्त झाले आहेत त्याना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवतो आहे ही बाब निदर्शनास येत आहे. कोरोनाच आणखी एक लक्षण दिसू लागलं आहे. पुण्यात रुग्ण दुपट होण्याचा रेट राज्यात सर्वात चांगला , पुण्यात 42 दिवसांत रुग्ण दुपट होतात, तोच दर राज्यात 30 दिवसाचा आहे. काही औषधं जर परिणामकारक नसेल तर याबाबतचा अंतिम निर्णय टास्कफोर्स ने घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

राज्यात मंदिरं आणि प्रार्थनास्थळं उघडणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याच्या निवासस्थान असलेल्या भागातील 200 च्या आसपास लोकांची तपासणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सप्टेंबरपासून शिक्षकांसाठी शाळा सुरू; या राज्यात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

राज्यातल्या 5 जिलह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू दर असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यात मुंबई 5.54 टक्के, नंदुरबार 4.48, लातूर, जळगाव 3.78,  रत्नागिरी 3.59, सोलापूर 4.35, अकोला 4.25 टक्के असा दर आहे.

First published:

Tags: Coronavirus