मुंबई, 15 जुलै: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शीतयुद्ध सुरु आहे. नाना पटोले यांच्यानंतर (Congress) काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनीही स्वबळाची भाषा केली. अशातच नेहमी पक्षाच्या विरोधात बोलणारे काँग्रेस नेते (Congress Leader) संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आज पक्षाची बाजू मांडली आहे. संजय निरुपम हे नेहमीच काँग्रेसच्या विरोधात बोलून पक्षाला घरचा आहेर देताना पाहिलं आहे. मात्र आता त्यांनी बऱ्याच दिवसांनी पक्षाची बाजू उचलून धरली आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे नक्कीच पक्षाला एक सुखद धक्का बसला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, सर्व राजकीय पक्षांना आपला पक्ष वाढवायचा आहे. काँग्रेसही स्वबळावर स्थानिक निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. जेणेकरून पाया मजबूत व्हावा. यात चुकीचं काय आहे? कॉंग्रेसच्या या रणनीतीवर दोन्ही मित्रपक्षांना आक्षेप का आहे? कॉंग्रेस नेहमी त्यांच्या मागे राहावा का?
सभी राजनीतिक पार्टियाँ अपना जनाधार बढ़ाना चाहती हैं।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 15, 2021
कॉंग्रेस भी अपने बूते पर स्थानीय चुनाव लड़ने की तैयारी कर रही है ताकि जमीन पर मज़बूत हो।
इसमें गलत क्या है ?
दोनों सहयोगी पार्टियों को कॉंग्रेस की इस रणनीति पर ऐतराज क्यों है ?
क्या कॉंग्रेस उनकी पिछलग्गू बनी रहे ?#स्वबल
असं ट्विट करत संजय निरुपम यांनी हॅशटॅग स्वबळ असा शब्द वापरला आहे. स्वबळाची घोषणा केल्यानंतर अजूनही वादाच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. राज्यातील आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणा पटोले यांनी केल्यानंतर सत्ताधारी आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर टीकेची झोड उठवली. हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली 2014 मध्ये आमच्यासोबत विश्वासघात झाला. तसा विश्वासघात पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी राहणार आहोत. जो काही निर्णय घ्यायचा तो पार्टी स्टॅटेजीच्या आधारे घेऊ, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.