जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'राज्यसभा निवडणुकीत सेनेचे एक मत फोडण्यासाठी 5 ते 10 कोटींचे 'गंगास्नान', सेनेचा भाजपवर थेट आरोप

'राज्यसभा निवडणुकीत सेनेचे एक मत फोडण्यासाठी 5 ते 10 कोटींचे 'गंगास्नान', सेनेचा भाजपवर थेट आरोप

चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. त्यामुळे सत्तांतरामागच्या कारस्थानावरील पडदा उघडला

चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. त्यामुळे सत्तांतरामागच्या कारस्थानावरील पडदा उघडला

चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. त्यामुळे सत्तांतरामागच्या कारस्थानावरील पडदा उघडला

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जानेवारी : ‘भाजपचे शिवसेना फोडण्याचे मिशन होते म्हणून सध्याचे सरकार बनविण्यात आले. महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले व त्या गंगेचे पाणी जामनेरमधून आले हे खरे नाही काय? असा सवाल करत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला. शिवसेना फोडणे हे भाजपचे ‘मिशन’ होते असं विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं. याच विधानावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्रातील सत्तांतर सहज घडले नाही व त्यामागे भाजपचे कठोर परिश्रम होते. अखेर मिशन यशस्वी झाले,’ असे महाजन म्हणाले. महाजन यांच्या बोलण्यातून महाराष्ट्राच्या जनतेस काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. ती महत्त्वाची आहेत. पहिले म्हणजे, शिवसेनेतून जे चाळीसेक लोक फुटले ते कोणत्याही उदात्त हेतूने फुटले नाहीत. म्हणजे शिवसेनेने हिंदुत्व सोडले वगैरे सांगून जे आपल्या बेइमानीचे समर्थन करीत आहेत ती बकवास आहे. येथे हिंदुत्व वगैरे गोष्टीचा काहीच संबंध नाही. हे महाजन यांनीच स्पष्ट केले. दुसरा मुद्दा म्हणजे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फुटली. शरद पवार यांनी कारस्थान करून शिवसेना फोडली असे बेइमान गटाचे आमदार बोलत होते. त्याची हवाच महाजन यांनी काढली, असा टोला सेनेनं भाजपला लगावला. (Shivsena : निवडणूक आयोगात शिंदेंनी टाकला ‘बॉम्ब’, ठाकरेंना बसणार सगळ्यात मोठा धक्का!) चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. त्यामुळे सत्तांतरामागच्या कारस्थानावरील पडदा उघडला आहे. शिंदे व त्यांच्याबरोबरचा गट हा बऱ्याच काळापासून फुटण्याच्या तयारीत होता व उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा मुहूर्त त्यांनी पकडला. बाकी सर्व भाजपने ठरवल्याप्रमाणे केले. शिवसेना फोडायचीच हे भाजपने ठरवूनच टाकले होते व त्या पद्धतीने सापळा रचला, अशी टीका सेनेनं केली. शिवसेना फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे रात्रीच्या अंधारात वेश पालटून बाहेर पडत व शिवसेनेच्या फुटीर आमदारांना भेटून सौदेबाजी करीत. फडणवीस यांच्या या ‘हरुन अल रशीद’ प्रकरणाचा गौप्यस्फोट खुद्द अमृता फडणवीस यांनीच केला. व्यवहार, देणेघेणे वगैरे पक्के झाल्यावर फुटीचा दिवस ठरला. शिवसेनेच्या फुटीनंतर फडणवीस वगैरे लोकांनी हात वर केले व या फुटीशी आमचा संबंध नसून ही शिवसेनेची अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगितले. मात्र गिरीश महाजन यांनी आता हा दावा खोटा ठरवला. भाजपने त्यांचे मिशन पूर्ण केले, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अखंडतेचा व स्वाभिमानाचा बळी दिला, अशी टीकाही सेनेनं केली. ( बैठकीला निघाले अन् हृदयविकाराचा धक्क्याने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन ) शिवसेना फोडण्याचे मिशन पूर्ण होताच महाराष्ट्रातील अनेक बडे उद्योग व गुंतवणूक गुजरातमध्ये पळविण्यात आली व राज ठाकरेंसारखे नेते ‘दोन-चार उद्योग महाराष्ट्रातून गेले म्हणून काय बिघडले?’ अशी भाषा बोलू लागले. शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर झाल्याची ही सुरुवात आहे. त्यामुळे भाजपचे मिशन पूर्ण झाले, असे गिरीश महाजन म्हणतात ते खरेच आहे, असं म्हणत सेनेनं राज ठाकरेंना टोला लगावला. भारतीय जनता पक्षाने त्यांचे मिशन ठरवले म्हणून चाळीस जण ‘दाम’ लावून फुटले. क्रांतीची वगैरे भाषा झूठ आहे. शिवसेना फोडली याचा भाजपवाल्यांना इतका आनंद झाला की, राज्यपालांसह भाजपच्या अनेक तोंडपाटलांची मजल छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यापर्यंत गेली. हिंदवी स्वराज्यातच शिवरायांचा अपमान करू व तो पचवून ढेकर देऊ हेसुद्धा भाजपचे एक मिशन पूर्ण झाले. महाजन यांनी चाळीस खोकेबाज आमदारांचे बिंगच फोडले व तेही मुख्यमंत्र्यांसमोर. महाजन हे ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा संदर्भ द्यायला विसरले. वास्तविक, सत्तांतराच्या या ‘ऑपरेशन’ व ‘मिशन’मध्ये या दोन्ही संस्थांचा सहभाग मोठा होता व त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय भाजपचे मिशन पूर्ण झाले नसते. कोणत्या आमदाराचे काय प्रकरण आहे व त्याच्या मागे कोणती यंत्रणा लावून त्याच्या गळय़ाभोवती फास आवळायचा हे या मिशनचे एक धोरण होते. मुख्यमंत्र्यांसह अनेक आमदारांची त्यामुळे कायमची झोप उडाली व त्यांना निद्रानाशाचा विकार जडला, अशी टीकाही सेनेनं केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात