मुंबई 4 जून: कोरोनाचं संकट निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईत तळ ठोकून आहेत. आणीबाणीची परिस्थिती असल्याने ते मुंबईबाहेर गेलेच नाहीत. निर्सग चक्रीवादळाचा बुधवारी जोरदार तडाखा बसला. यात रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला. याच जिल्ह्याची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री जाणार आहेत अशी माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रायगड जिल्ह्यात चक्रिवादळाने केलेल्या नुकसानीची पहाणी करणार. दुपारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांसोबत ते बैठकही घेणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, चक्रीवादळानंतरही पवारांनी पक्षनेत्यांची बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचेल याची काळजी घ्या अशी सूचना त्यांनी उपस्थित सर्व नेत्यांना केली. शरद पवार यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक घेऊन हा आढावा घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे या बैठकीला उपस्थित होते. चीनला दणका! भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान झाला नवा लष्करी करार निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आणि मदतकार्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षनेत्यांसोबत आढावा घेतला आणि काही सूचनाही केल्यात. बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर कोट्यवधींची हानी झाली होती. मुंबईत फारसा धिंगाणा न घालता हे वादळ पुढे निघून गेलं. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालं होतं. हे वाचा - आजही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ, ओलांडली धोक्याची पातळी शाळा सुरू करणं या देशाला पडलं महागात; 250 मुलं कोरोनाग्रस्त, 6800 जण क्वारंटाइन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.