विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबईतील मालाड परिसरामध्ये एका झोपडपट्टीमध्ये भीषण अग्नितांडव घडले. एकापाठोपाठ 15 सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आगीत 10 ते 15 झोपडीधारक जखमी झाले आहेत. तर 50 पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. मुंबईतील मालाड परिसरामधील दिंडोशी येथीलजामऋषी नगर (आंबेडकर नगर) मध्ये आज सकाळी भीषण आग लागली. बघता बघता काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केलं.
मुंबईतील मालाड परिसरामधील दिंडोशी येथील पारेख नगरमध्ये आज सकाळी आग लागली. pic.twitter.com/iYyXhxfv2A
— News18Lokmat (@News18lokmat) February 13, 2023
पश्चिम उपनगरांतील मालाड पुर्वकडील जामऋषी नगर (आंबेडकर नगर) या वन जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टीला सकाळी 11 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत 14 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून 15 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. (समलैंगिक ॲपवरून ओळख, IITच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार, तंत्रविद्येचाही वापर, मुंबईतील हादरवणारी घटना) आग लागलेल्या झोपडीतील सिलेंडर फुडल्याने आगीचे रौद्ररूप धारण केले. फुटलेल्या सिलेंडरमुळे मयत १४ वर्षीय तरुणाच्या गळामध्ये पत्र्याचा तुकडा घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. ( IIT Bombay : एकटेपणाला कंटाळला? सातव्या मजल्यावरुन उडी घेत मुंबईत IIT च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल ) येथील वन जमिनीवर प्लास्टिक आणि लोखंडी पत्र्यांच्या झोपड्या आहेत. सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान एक सिलेंडर फुटला. फुटलेल्या सिलेंडरमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी घरांबाहेर पळ काढला. यामुळे एका- मागून एक अशी १५ सिलेंडर फुटल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. दामूनगरनंतरची सर्वांत मोठी आग कांदिवली येथील वन जमिनवरील वसलेल्या दामूनगर येथील झोपडपट्टीला ४ डिसेंबर २०१५ साली असाच प्रकारे सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या आगीत ७ झोपडीधारकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर २५ जण जखमी झाले होते. या आगीच्या ७ वर्षांनंतर पुन्हा अशाच प्रकारची आग जामऋषी नगरातील झोपडपट्टीला लागलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील वन जमिनीवरील झोपड्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. आता शिंदे - फडणवीस सरकारकडून पुनर्वसन होईल का? हे पाहणे औचित्यांचे ठरेल.