मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मयुर शेळकेच्या जिगरबाजीचं मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक; रेल्वेकडून 50 हजाराचं बक्षीस

मयुर शेळकेच्या जिगरबाजीचं मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक; रेल्वेकडून 50 हजाराचं बक्षीस

वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयूर शेळकेचे (Mayur Shelke) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फोन करून कौतुक केलंय.

वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयूर शेळकेचे (Mayur Shelke) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फोन करून कौतुक केलंय.

वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयूर शेळकेचे (Mayur Shelke) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फोन करून कौतुक केलंय.

मुंबई, 21 एप्रिल: वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयुर शेळकेचे (Mayur Shelke) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फोन करून कौतुक केलंय. 'तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलीकडचं काम केलंत तुम्ही', अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली.

काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह फलाटावरून चालत असताना तिच्या मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे ट्रँकवर पडला. त्याचवेळी समोरून भरदाव वेगाने एक्सप्रेसही येत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या 7 सेकंदात मयुर शेळके या जिगरबाज रेल्वे पाँईटमनने लहान मुलाचा जीव वाचवला. या थरारक साहसाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. मयुर शेळकेच्या जिगरबाज कामगिरीचं त्यामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मयुरने दाखवलेल्या शौर्याचे कौतुक म्हणून रेल्वेकडून (Indian Railway) त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. याआधी रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनीही स्वतः मयूरला फोन करून कौतुक करत त्याच्या या कार्याची दखल घेतली होती. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीही त्याचे कौतुक केल्याने तो भारावून गेला आहे.

काय घडलं होतं नेमकं?

वांगणी स्टेशनवर शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. लहान मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रकवर पडला नेमकं त्याच वेळेला एक मेल-एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने येत होती. त्या मुलाची आई अंध होती, ती आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बिचारी कावरी बावरी झाली होती. तिला कळेना की नेमका तो कुठे पडला आणि तितक्यात उदयन एक्सप्रेस धडधड आवाज करत स्टेशनच्या दिशेने जोरदार वेगाने येत हाती.

तो लहानगा अजून सावरला पण नव्हता आणि ट्रेनही जवळ येताना दिसली. तो मुलगा प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता, पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने तो वर चढू शकत नव्हता. तितक्यात एक व्यक्ती जिवाच्या आकांताने त्या मुलाच्या दिशेने धावताना दिसली.

(हे वाचा - उद्घाटनापूर्वीच दवाखाना दिला कोरोना रुग्णांसाठी; सोलापूरच्या डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी)

तो व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता त्या मुलापर्यंत पोहोचला. पटकन त्याने मुलाला उचललं आणि प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं आणि तो स्वतः विजेच्या गतीने प्लॅटफॉर्मवर चढला. तो व्यक्ती म्हणजे रेल्वेचा पॉइंटमन मयूर शेळके. मयूर कर्तव्यावर होता. त्याही परिस्थितीत त्याने आपल्या हातातील हिरवा झेंडा सोडला नाही.

(हे वाचा - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला)

मयूर हा पॉईंटमन आहे. पॉईंटमन म्हणजे ट्रेनला पुढे जाण्यासाठी ट्रॅक सुरक्षित आहे म्हणून हिरवा झेंडा दाखवण्याचं काम असो की जिथे ट्रॅक एकमेकांत गुंतलेले असतात तिथे सगळं आलबेल आहे हे पाहण्याचं काम करतात.

First published:

Tags: Indian railway, Mumbai News, Railway track accident