मुंबई, 05 जून : राज्यसभा निवडणुकीची (rajya sabha election) चुरस आता आणखी वाढली आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात असल्यामुळे जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपनेही (bjp) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यसभेची रणनीती ठरवण्यासाठी राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर तिसरी जागा आम्हीच जिंकू, सेनेचे संजय जिंकणार नाही, असा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला. राज्यसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजप नेत्यांची बैठक पार पडली. भाजप प्रदेश कार्यालयात केंद्रीय रेल्वेमंत्री आणि निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव पोहोचले होते. आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय या बैठकीला हजर होते. तर गिरीश महाजन आणि प्रसाद लाड प्रवीण दरेकर ही हजर होते तर कोरोनाची लागण झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ( बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! कतरिना, आदित्य नंतर किंग खान शाहरूखला कोरोना ) अश्विन वैष्णव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. निवडणुकीचा आढावा, रणनिती सर्व तयार आहे. भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणारच आहे. शिवसेनेचा संजय जिंकणार नाही. कोल्हापूरातील त्यांचे आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळले तरी खूप आहे, असा दावा शेलार यांनी केला. ( PHOTO: Jio वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रम करणारी राधिका मर्चंट आहे तरी कोण? ) ‘संजय राऊत यांचे बोलणे हे बालीशपणाचे आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित पराभव दिसत असेल त्यामुळे ते असे बोलत आहे, ही वेळ त्यांच्यावर का येते. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप त्यांनी केले आहे. लोकशाहीत आजवर असे कधी झाले नव्हते. जे तबेल्यात राहातात त्यांनाच असे स्वप्न पडतात. त्यांनी जरा घरात राहाणे सुरू करावे, अशी टीकाही शेलार यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.