मुंबई, 04 ऑक्टोबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी(anvay naik suicide case) रिपब्लिक वृत्तवाहिनीचे (Republic TV editor ) संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावर हल्ला असून यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे’ अशी संतप्त प्रतिक्रिया शहांनी दिली. आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून अटक केली आहे. त्यांना चौकशीसाठी अलिबागला नेण्यात येणार आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. अमित शहा यांनीही या प्रकरणावरून ट्वीट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
Congress and its allies have shamed democracy once again.
— Amit Shah (@AmitShah) November 4, 2020
Blatant misuse of state power against Republic TV & Arnab Goswami is an attack on individual freedom and the 4th pillar of democracy.
It reminds us of the Emergency. This attack on free press must be and WILL BE OPPOSED.
‘काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणणारे कृत्य केले आहे. राज्य सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करुन अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली आहे’, अशी टीका शहा यांनी केली. तसंच, ‘सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारिता आणि एका व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. पत्रकारितेवर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे’, असंही शहा म्हणाले. त्याचबरोबर, पत्रकारितेवर झालेल्या या हल्ल्याचा अमित शहा यांनी निषेध व्यक्त केला आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नगर, औरंगाबाद जिल्ह्यात मोठी कारवाई इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. काय आहे प्रकरण? अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018 अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसाईट नोट आढळून आली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.