जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात 'कोरोना'चा धोका आणखी वाढला

मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात 'कोरोना'चा धोका आणखी वाढला

मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात 'कोरोना'चा धोका आणखी वाढला

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूने शनिवारी मुंबईत चार जणांचा बळी घेतला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 एप्रिल: मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूने शनिवारी मुंबईत चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे एकट्या मुंबईत मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. त्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळी भागात आणखी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी 52 नवे रुग्ण आढळले. त्यात एकट्या वरळी, जिजामात नगरातील 17 रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 330 झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत शनिवारी 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईतील एकूण 34 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. हेही वाचा.. कनिकाच्या 5 व्या कोरोना व्हायरस टेस्टचा रिपोर्ट समोर, रुग्णालयाने दिले नवे अपडेट वरळी, जिजामाता नगर परिसरातील 135 जणांना महापालिकेने क्वारंटाईन केलं आहे. यापूर्वी वरळीतील कोळीवाड्यात 18 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. जिजामाता नगर मधल्या या रुग्णांना परळ येथील रहेजा आणि पोद्दार हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. कोळीवाड्यातील 500 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.मुंबईकरांनो सावधान! पहिल्या मृत व्यक्तीचं तबलिगी कनेक्शन कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यातही सर्वात जास्त धोका मुंबईला निर्माण झाला आहे. असं असतानाही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये आतापर्यंत तीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचं थेट कनेक्शन दिल्लीत निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमासोबत असल्याचं समोर येत आहे. हेही वाचा… BREAKING:मुंबईत कोरोनाने शनिवारी घेतला चौघांचा बळी, मृतांचा आकडा 22 वर निजामुद्दीन मरकजमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी 10 लोकांपैकी 6 जण मुंबईतील धारावी परिसरात राहात होते. त्यापैकी चार लोक सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये वेगवेगळ्या भागांत 4 जण राहात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी 2 लोकांचा पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. अद्यापही हे दोन जण सापडू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईचा धोका वाढला आहे. धारावीमध्ये 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा व्यक्ती तबलिगी जमातच्या लोकांना भेटला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तबलिगी जमातचे 4 जण केरळमध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात