नवी दिल्ली, 20 मार्च : उर्जा मंत्री राज कुमार सिंह (RK Singh) यांनी शुक्रवारी ग्राम उजाला योजना (Gram UJALA Scheme) लाँच केली. या योजनेअंतर्गत केवळ 10 रुपयांत एलईडी बल्ब मिळणार आहेत. सरकारचा ग्रामीण भारतातील अंधार दूर करणं हा या योजनेचा उद्देश आहे.
ही योजना कंवर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेडतर्फे (CESL) लाँच करण्यात आलं आहे. या अंतर्गत CESL पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी बल्ब उपलब्ध करुन देणार आहे. ही सरकारी कंपनी जगातील सर्वात कमी दरातील एलईडी बल्ब विकत आहे. ही EESL (Energy Efficiency Services Ltd) ची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे. EESL भारत सरकारची एनर्जी कंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठी एनर्जी सर्विस कंपनी आहे. याची 100 टक्के भागीदारी भारत सरकारकडे आहे.
तीन वर्षांची वॉरंटी -
ग्राम उजाला प्रोग्रामअंतर्गत पहिल्या टप्प्यात 7 आणि 12 वॅटचे LED bulbs उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात बिहारच्या आग्रा, उत्तर प्रदेशातील वाराणसी, आंध्र प्रदेशातील विजयवाडा, महाराष्ट्रातील नागपूर आणि पश्चिम गुजरातमधील काही जिल्ह्यात बल्ब उपलब्ध होणार आहेत. या बल्बची वॉरंटी तीन वर्षांची असेल आणि हे बल्ब केवळ ग्रामीण भारतात उपलब्ध करण्यात येणार आहेत.
भारतात अद्यापही 300 मिलियन जवळपास 30 कोटीहून अधिक पिवळे बल्ब आहेत. या बल्बला एलईडी बल्बशी रिप्लेस केल्यास, दरवर्षी 40,743 मिलियन किलोवॅट उर्जेची बचत होईल. त्याशिवाय कार्बन डायऑक्साईडमध्येही वर्षाला 37 मिलियन टनची कमी येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram, Gram ujala scheme, Money, Red light, Scheme