मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'प्रत्येक वेळी खुर्चीवरच बसायचं, याला राजकारण म्हणत नाही', पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

'प्रत्येक वेळी खुर्चीवरच बसायचं, याला राजकारण म्हणत नाही', पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

'राजा सारखं मन ठेऊन ज्याचं मन असतं त्याला राजकारण म्हणतात. प्रत्येक वेळी खुर्चीवरच बसायचं आहे...'

'राजा सारखं मन ठेऊन ज्याचं मन असतं त्याला राजकारण म्हणतात. प्रत्येक वेळी खुर्चीवरच बसायचं आहे...'

'राजा सारखं मन ठेऊन ज्याचं मन असतं त्याला राजकारण म्हणतात. प्रत्येक वेळी खुर्चीवरच बसायचं आहे...'

नाशिक,  01 नोव्हेंबर : 'राजा सारखं मन ठेऊन ज्याचं मन असतं त्याला राजकारण म्हणतात. प्रत्येक वेळी खुर्चीवरच बसायचं आहे याला राजकारण म्हणत नाही' असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी पुन्हा एकदा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचं नाव न घेता टोला लगावला.

नाशिकमध्ये (nashik)  शासकीय रुग्णालय विस्तारीकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने दोन ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर आले.  भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर  नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धोंडविर नगरच्या महात्मा फुले चौक सुशोभीकरण कामाचे उद्घाटनही दोन्ही नेत्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली.

'राजा सारखं मन ठेऊन ज्याचं मन असतं त्याला राजकारण म्हणतात. प्रत्येक वेळी खुर्चीवरच बसायचं आहे याला राजकारण म्हणत नाही.  मी मुंडे साहेबांच्या फोटोकडे बघून म्हणते मी राजकारणात का आले, ज्यांना कशाचा अधिकार नव्हता. आशा लोकांचा आवाज बनायचं असं मला मुंडे साहेब सांगायचे. नुसतं भाषण करून काही होत नाही आमच्या मराठवाड्यात दुष्काळच दुष्काळ आहे. जिथे विकास कमी तिथं राजकारण आणि राजकारणच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

15 हजारहून कमी किंमतीत मिळतोय 108 कॅमेरा असणारा जबरदस्त Smartphone

तसंच, तुमच्या डोळ्याला दिसणारा विकास केला आहे धार्मिक म्हणजे अंधश्रद्धाळू नको. मी उद्या नाशिकच्या बससेवेचा आनंद घेणार आहे. मी आमदार नाही त्यामुळे तिकीट काढुन आनंद घेणार, कारण नाशिकच्या बससेवेच कौतुक झालंय. नाशिकमध्ये अनेक चांगली विकास काम झाली आहे. महिला आमदारांचा अधिक जोर आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांचं कौतुक केलं.

'माझं आणि तुमचं नातं आहे, मी माहेरीच येते. आता कळलं का राजकारणात मला साहेबांनी का आणलं. पंतप्रधान मोदी यांनी इतके जोरदार आहेत की आता कोणी हलूच शकत नाही. आतापर्यंत असं वाटत होतं पंतप्रधानांच्या घरातच प्रधान मंत्री होतो.  मात्र गरीब कुटुंबातील प्रधान  मंत्री झाले, असंही पंकजा म्हणाल्या.

फॅन्सनी गुपचूप दुबईत बनवलेला दीपिका पादुकोणचा 'तो' VIDEO व्हायरल

'मुंडे साहेब म्हणायचे जावा त्याच्या अंशा तेव्हा कळे. जनता खूप हुशार आहे योग्य वेळी योग्य माणसाच्या मागे उभे राहते. नाशिकची जनता खूप हुशार आहे.  मुंडे साहेबांचं नाशिकवर प्रेम आणि माझं ही प्रेम आहेच. साहेबांचं नाव दिल म्हणजे मी येणारच, आपली ताकद पुन्हा एकदा जगाला दाखवून देऊ, असंही पंकजा म्हणाल्या.

First published: