मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'..तर निधी मिळणार नाही, भाजपकडून काँग्रेसच्या सरपंचांना फोन'; माजी आमदाराचा गंभीर आरोप

'..तर निधी मिळणार नाही, भाजपकडून काँग्रेसच्या सरपंचांना फोन'; माजी आमदाराचा गंभीर आरोप

मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. मात्र आता यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.

मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. मात्र आता यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.

मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. मात्र आता यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर, 21 डिसेंबर :  मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. मात्र आता यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींवर गंभीर आरोप केला आहे. भाजपचे आमदार सरपंचांना फोन करून नीधी न देण्याची भीती दाखवत आहेत, तसेच त्यांना पाठिंबा देण्याबाबत बोलत असल्याचं सिद्धाराम म्हेत्रे यांनी म्हटलं आहे.  सिद्धाराम म्हेत्रे यांच्या आरोंपामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हटलं म्हेत्रे यांनी? 

काँग्रेसचे माजी आमदार  सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपचे आमदार  सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे आमदार निवडून आलेल्या सरपंचांना फोन करून निधी न देण्याची भीती दाखवत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील 20 पैकी 11 ग्रामपंचायंतीमध्ये आमची सत्ता आली. मात्र सत्तेतील लोक निवडून आलेल्या सरपंचांना फोन करून त्यांना पाठिंबा न दिल्यास निधी देणार नाही अशी भीती दाखवत आहेत. तसेच ते निवडून आलेल्या सरपंचांना म्हेत्रे यांना पाठिंबा देऊ नका असं देखील सांगत असल्याचा आरोप सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे.

हेही वाचा : 'मविआ'तून बाहेर पडलेल्या 'स्वाभिमानी'ला ठाकरे गटाचा पाठिंबा; शेट्टींच्या आंदोलनात कार्यकर्त्यांच्या धरणात उड्या

'सरपंचांचा पाठिंबा देण्यास नकार ' 

पुढे बोलताना म्हेत्रे यांनी म्हटलं की,  आमच्या सरपंचांना फोन येत आहेत. मात्र त्यांनी तिकडे जाण्यास नकार दिला आहे. त्यांनी भाजपला सांगितलं आहे की, आम्हाला पुढील दीड वर्ष निधी मिळाला नाही तरी चालेल, नंतर आमचीच सत्ता येणार आहे. जनतेने आम्हाला संधी दिली आहे, या संधीचं सोनं करून आम्ही गावचा विकास करू असा दावाही यावेळी म्हेत्रे यांनी केला आहे.

First published:

Tags: BJP, Congress, Election, Solapur