मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सोलापूरच्या विकासासाठी 72 वर्षांचा वृद्ध मैदानात, पाहा कोणत्या प्रश्नासाठी आली वेळ, Video

सोलापूरच्या विकासासाठी 72 वर्षांचा वृद्ध मैदानात, पाहा कोणत्या प्रश्नासाठी आली वेळ, Video

X
Solapur

Solapur News : सोलापूरकरांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी वयाच्या 72 व्या वर्षी अर्जुन रामगिर यांनी हा संकल्प घेतला आहे.

Solapur News : सोलापूरकरांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी वयाच्या 72 व्या वर्षी अर्जुन रामगिर यांनी हा संकल्प घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

    अनुराग सुतकर, प्रतिनिधी

    सोलापुर, 15 मार्च : होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणे आणि सोलापूरच्या प्रलंबित विकासकामांसंदर्भात सरकारला जागे करण्यासाठी सोलापूरातील 72 वर्षाचे अर्जुन रामगिर यांनी सोलापूर ते मुंबई आत्मकलेष पदयात्रेस सुरूवात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सोलापूरच्या विकासासाठी कोणतीच विशेष अशी तरतुद नसल्याने शासन दरबारात सोलापूरकरांना काडीमात्र किंमत नसल्याचे सिद्ध झाले आहे, अशी संतप्त भावना अर्जुन रामगिर यांनी व्यक्त केली आहे.

    सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी 

    सोलापूरकरांनी निवडून दिलेले सर्व आमदार सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर विधीमंडळात काहीच मागणी करत नाहीत, अशी खंत सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे. सोलापूर सोडून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विमानतळांना भरीव निधी मंजूर करण्यात आले आणि सोलापूरकरांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि त्याच्या विकासाकरिता दमडीमात्र तरतुद नसल्याने सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

    Maharashtra Budget : बजेटमधील घोषणांवर अंगणवाडी सेविका अद्याप नाराज, पाहा काय आहे कारण Video

    संकल्प घेतला

    सोलापूरवर जाणीवपूर्वक सरकारच्या वतीने होणार्‍या अन्याया विरोधात सोलापूरकरांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी वयाच्या 72 व्या वर्षी अर्जुन रामगिर यांनी हा संकल्प घेतला आहे. सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी हे करत असून, माझ्या हयातीत सोलापूरला जागतिक पातळीवर अव्वल मानांकित शहर म्हणून ख्याती प्राप्त झाल्याचे मला पाहायचे असलेल्याची भावना अर्जुन रामगिर यांनी व्यक्त केली आहे.

    Maharashtra Budget : सोलापूर विद्यापीठाला अभिमत दर्जा, विद्यार्थ्यांना काय होणार फायदा?

    पदयात्रा थांबवण्याचे आवाहन

    अर्जुन रामगिर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या सोलापूर ते मुंबई आत्मकलेष पदयात्रास सोलापूरकरांचा पाठिंबा असून अनेकांनी याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने अनेक अधिकाऱ्यांनी अर्जुन रामगिर यांना विनंती करत पदयात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. परंतु ध्येयाशी निष्ठावंत असणारे अर्जुन रामगीर हे मात्र मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी पायी मुंबईला निघाले आहेत. वाटेत मिळेल तेथे आसरा घेत ते पुढे निघत आहेत. साधारणपणे या रविवारपर्यंत ते मुंबईला पोहोचतील.

    First published:

    Tags: Local18, Solapur