मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर शिवसेना मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर शिवसेना मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

 शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर धक्कादायक खुलासा केला आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर धक्कादायक खुलासा केला आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर धक्कादायक खुलासा केला आहे.

रत्नागिरी, 22 मे: शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर धक्कादायक खुलासा केला आहे. तहसिलदारांनी मुंबईकरांना थेट गावात सोडल्यामुळेच रत्नागिरीसह कोकणात कोरोना रुग्णसंख्या वाढली, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, तहसिलदारांनी स्वॅब टेस्ट केलेल्या नागरिकांना त्यांचे रिपोर्ट येण्यापूर्वीच थेट गावात सोडले. मंडणगड, दापोली आणि संगमेश्वरमध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. मंडणगड, दापोली संगमेश्वरच्या तहसिलदारांवर कुणाचा होता दबाव? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा... महाराष्ट्र हादरला! कोरोनामुळे एकाच दिवशी पोलिस दलातील तीन अधिकऱ्यांचा मृत्यू

दुसरीकडे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप आमदारांच्या कोकण दौऱ्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यानी रेड झोनमधून आलेल्या भाजप आमदारांनी आधी स्वत: क्वारंन्टाइन व्हावे आणि मगच कोकणात फिरावे अन्यथा कोकणात कोरोना फैलावाचा धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

त्याला उत्तर देताना दरेकर यांनी राज्यात दौरे करणाऱ्या गृहमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांना आधी क्वारन्टाइन करा, मगच भाजपाबध्दल बोला, असं सामंत यांना सुनावलं आहे. त्यामुळे कोरोनावरुन कोकणात सेना भाजपामधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे, आम्ही भाजपचे पाच विधानपरिषद आमदार कोकणातल्या कोरोना टेस्ट लॅबसाठी प्रत्येकी वीस लाख रुपये द्यायला तयार आहोत. पण लॅब सुरु करुन दाखवा, असं जाहीर आव्हानही भाजपने सरकारला दिलं आहे.

हेही वाचा.. जितेंद्र आव्हाडांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले 'हिच ती वेळ'

दरेकरांच्या म्हणण्यानुसार कोकणात जे मुंबईकर आलेले आहेत. त्यांना त्यांच्या गावात ज्या ठिकाणी क्वारन्टाइन करण्यात आलेले आहे तिथे प्रशासनाने पुरेशा सुविधाच दिलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांचे हाल होत असून गावागावात गावकरी आणि मुंबईकर यांच्यात वाद होत आहेत.

मुंबईकरांना खरंतर एसटीच्या गाड्यांनी कोकणात मोफत सोडणे आवश्यक होते. पण कोकणचेच सुपुत्र असलेले परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतीत काहीच हालचाल केली नाही.

सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांचे प्रमाण पाहता कोरोना चाचणी लॅब तातडीने उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील हॉस्पिटलची मदत घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आम्ही भाजपचे पाच विधानपरिषद आमदार प्रत्येकी वीस लाख रुपये या टेस्ट लॅब साठी देण्यास तयार आहोत सरकारने तातडीने लॅब सुरु करावी . या प्रमुख मागण्या करत दरेकर यानी हे सरकार कोरोनाबाबतच्या उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी झाल्याची टीका केली.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus