मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उद्धव ठाकरेंची नवी रणनीती, आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत, महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अंक?

उद्धव ठाकरेंची नवी रणनीती, आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत, महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अंक?

 उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषदेच्या सदस्यात्वाचा राजीनामा देणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई, 13 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचादेखील राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात विधान परिषदेच्या सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. विधान परीषदेत शिवसेनेचं  संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष कार्यकारणीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण विधान परीषद आमदारकीच्या राजीनाम्याचीही घोषणा केली होती. त्यांनी त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा पत्रही दिले होते. मात्र विधान परीषद सदस्याचा राजीनामा हा विधान परीषद सभापतींकडे द्यावा लागतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ग्राह्य धरला गेला नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विधान परीषद आमदार म्हणून कार्यरत आहेत. विधानपरिषदेचं संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(आर आर पाटलांचा मुलगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाण)

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी पुकारलेल्या या बंडाविरोधात उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडूनही शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे.

" isDesktop="true" id="745881" >

 शिंदे गट आणि भाजपचा सामना करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखली आहे. राजकारणात संख्याबळाला महत्त्व असतं. या संख्याबळाचं महत्त्व आता मुख्य शिवसेनेलादेखील समजलं आहे. त्यामुळे विधान परिषदेत संख्याबळ कमी होवू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published:

Tags: Maharashtra News, Shiv sena, Uddhav thackeray