मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सांगोला ते विधानसभा, एसटी बसनेच प्रवास; असे होते आमदार गणपराव देशमुख!

सांगोला ते विधानसभा, एसटी बसनेच प्रवास; असे होते आमदार गणपराव देशमुख!


उच्च विचार, साधी राहणी हे प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण गणपतराव देशमुख हे आपल्या विचारांना पक्के होते.

उच्च विचार, साधी राहणी हे प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण गणपतराव देशमुख हे आपल्या विचारांना पक्के होते.

उच्च विचार, साधी राहणी हे प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण गणपतराव देशमुख हे आपल्या विचारांना पक्के होते.

मुंबई, 30 जुलै : कार्यकर्ता बॅनरवर झळकला तर दुचाकीशिवाय खाली उतरत नाही. आणि जर एखाद्या पक्षाचा साधा नेता जरी असला तर तो चारचाकी गाडीच्या खाली फिरत नाही. पण, या सर्वांना ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganapatrao Deshmukh)  अपवाद होते. मुंबईची विधानसभा असो किंवा नागपूरचे हिवाळी अधिवेशन गणपतराव देशमुख हे ठरल्याप्रमाणे एसटी (st bus) महामंडळाच्या बसनेच यायचे.

उच्च विचार, साधी राहणी हे प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण गणपतराव देशमुख हे आपल्या विचारांना पक्के होते. तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले. पण, त्यांनीही आमदारकीचा मोठेपणा मिरवला नाही. गरीब, शोषितांसाठी त्यांनी उभे आयुष्य खर्ची घातले. गणपतराव देशमुख हे मुंबईला  महामंडळाच्या एसटी बसनेच यायचे. २०१७ मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सुद्धा गणपतराव देशमुख एसटी बसनेच आले होते. पहिल्या टर्मपासून त्यांनी क्रम मोडला नाही, तो शेवटपर्यंत कायम राखला.

गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. या माध्यमातून लोकांना न्याय देता देता त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी काम करण्याची जवळीक झाली. 1950 पासून ते शेकापचे सक्रिय कार्यकर्ते झाले.

कोरोनाचा नवा व्हेरियंट महाघातक, अमेरिकेकडून शिक्कामोर्तब

1962 साली गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली. पहिली निवडणूक लढवताना दुष्काळी सांगोल्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी लढाई सुरू केली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.

1972 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण दोन वर्षांतच झालेल्या पोटनिवडणुकीत गणपतराव पुन्हा निवडून आले ते सलग 1995 पर्यंत. याकाळात 1977 साली त्यांनी  महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभळले होते.

पुलोद काळात 1978 साली ते पहिल्यांदा राज्यमंत्री मंडळात सहभागी झाले. त्यानंतर 1999 साली पुन्हा मंत्री झाले. याकाळात त्यांनी दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कायम लढा दिला.  त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुष्काळी सांगोल्यात टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले.

...त्या बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला बजावले

1995 च्या पराभवानंतर गणपतराव देशमुख यांनी 1999  पुन्हा निवडून आले. 2014 पर्यंत त्यांनी 11 वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. 2019 साली सुद्धा त्यांना निवडणूक लावण्याचा आग्रह समर्थ समर्थकांनी केला. पण 94 वर्ष असलेले वय तसेच शरीर साथ देत नसल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्यावर ठाम राहत आपला निर्णय बदलला नाही.

एकच शेतकरी कामगार पक्ष, एकच मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि एकच उमेदवार गणपतराव देशमुख महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे. आजोबांपासून नातवाचेही मतदान गणपतराव यांना मिळाले होते.  आयुष्यातील 50 वर्ष त्यांनी विधानसभेतील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे काम पाहिली होती. तसंच आपल्या कामाचा ठसा सुद्धा त्यांनी राज्यातील राजकारणात उमटवला होता. आज त्यांच्या जाण्यामुळे विधानसभेचा एक साक्षीदार निखळला अशी भावना व्यक्त होत आहे.

First published:
top videos