नाशिक, 17 डिसेंबर : हा मोर्चा महाविकास आघाडीचा आहे. आम्हाला घेण्यावरुन मतभेद आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही. आम्हाला सोबत घेण्याबाबत शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते नाशिक येथे बोलत होते. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर - काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचं नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे. नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. उद्धव ठाकरे यांनी फक्त असं कळवले होते की, ‘आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घायचा विचार करू’. मात्र, अजित पवार म्हणाले की, ‘हा प्रश्न अजून विचाराधीन आहे’. याचा अर्थ नाही असा होतो. राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे, त्यांना गरीब मराठा देखील चालत नाही. मी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो नाही. ते राजगृहावर भेटायला आले. एक कुटुंब म्हणून आम्ही स्वागत केलं. इंदू मिल संदर्भात विषयांवर चर्चा झाली. एक गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. महापुरुषांनी आदर्श समाजात ठेवला आहे. हेही वाचा - शिंदे सरकार कधीपर्यंत टिकणार? राऊतांनी महामोर्चात डेडलाईनच सांगून टाकली भाजपवर मीच जास्त टीका करतो - भाजपचा सामाजिक आणि राजकीय लढ्यात सहभाग नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सिम्बॉल्स नाही. त्यामुळे जे सिम्बॉल्स आहे, त्याला काळे भासण्याचे काम सुरू आहे. जाता जाता चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, ‘आरएसएस ने खोक्याच्या संस्कृतीतून संस्था उभ्या केल्या’ त्यांनी जर वेळ दिला तर आम्ही जाहीर सत्कार करू, असेही ते म्हणाले. आज भाजपवर मीच जास्त टीका करतो. मी चाळीस वर्षे राजकारणात आहे, पण डाग नाही, तर सगळे डागळलेले आहेत, अशी जोरदार टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.